21 कोटी शेतकऱयांना मिळणार : जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात 2020-21 या वर्षातील खरीप हंगामात या वषी विक्रमी 82 हजार 260 क्विंटल भात खरेदी झाली आहे. त्यामुळे 21 कोटी रुपये शेतकऱयांच्या बँक खाती जमा होणार आहेत. भात खरेदी केंदे वाढविल्यामुळे भात खरेदी वाढल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात 2019-20 या मागील वर्षात फक्त 36 हजार क्विंटल भात खरेदी झाली होती. यावषी त्यात दुपटीपेक्षा जास्त विक्रमी भात खरेदी झाली आहे. यावषी तब्बल 82 हजार 260 क्विंटल भात खरेदी झाली आहे. त्यामुळे दोन हजार 568 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 21 कोटी रुपये शेतकऱयांना मिळणार आहेत. बऱयाच शेतकऱयांच्या बँक खात्यात रक्कम जमा सुद्धा झाली आहे.
माजी पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांनी चांदा ते बांदा योजनेतून यांत्रिकीकरण शेतीवर भर दिला. याचा फायदा भातपीक उत्पादनावर चांगला झाला. तसेच भात खरेदी केंद्र वाढविली. 30 केंदे सुरू केली होती. त्यामुळेच शेतकऱयांनी भात खरेदी केंद्रावर येऊन आपले भात घातले आणि यावषी शेतकऱयांना मोठा फायदा झाला आहे.
यावषी भात खरेदीला चांगला दरही शासनाने दिला. पालकमंत्री उदय सामंत यांनी बारदान उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे यावषी भात खरेदीत अडचण झाली नाही. आता शेतकरी वर्गानेही जमीन पडीक न ठेवता भातशेती करावी. शासनाने ‘पिकेल ते विकेल’ ही योजना सुरू करून उत्पादित मालाची हमी घेतली आहे. भविष्यात सुद्धा शेतकऱयांना चांगला फायदा होण्यासाठी पणनमंत्री बाबासाहेब पाटील यांना भेटणार, असे सावंत यांनी सांगितले.