सौंदत्ती श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी जात असताना रामदुर्ग तालुक्यातील चिंचणूर श्री विठ्ठल मंदिराजवळ झालेल्या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
महेंद्र कंपनीच्या एका मालवाहू गाडीने रामदुर्ग तालुक्यातील हूलकुंदचे रहिवासी हणमव्वा म्यागाडी(२५) दीपा(३१) सविता(१७) सुप्रिता(११) मारुती(४२) आणि इंद्रव्वा(२४) सौंदत्तीला चाललेले होते. यावेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या वडाच्या झाडाला भीषण धडक दिल्याने झालेल्या अपघातात ६ जण जागीच ठार झाले.
घटनेत जखमींना उपचारासाठी गोकाक तालुका इस्पितळात रवाना करण्यात आले. कटकोळ पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत ही घटना घडली आहे.
मृतांच्या परिवाराला प्रत्येकी ५ लाख रुपये मदद देण्याची घोषणा जिल्हापालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी केली असून, याला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी संमती दिली आहे.