प्रतिनिधी /पणजी
गावात मंदिर उभारून तुम्ही सर्वांनी सामूहिक शक्तीचे प्रदर्शन घडविले आहे. सांघिकतेत प्रचंढ शक्ती दडलेली आहे. तुमच्या भक्तीमुळे आणि सामूहिक शक्तीमुळे कोणताही विकास साधण्याची किमया तुम्हाला शक्मय होणार आहे. हीच शक्ती तुम्हाला सर्व प्रकारचे अडथळे पार करण्यात मदत करणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांनी केले.
खानापूर तालुक्मयातील मौजे डोंगरगांव येथे श्री गणेश मंदिराचे उद्घाटन आणि श्री गणेश मूर्ती प्रति÷ापना केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री. नाईक बोलत होते. या कार्यक्रमाला खानापूर तालुक्मयाच्या आमदार सौ. अंजलीताई निंबाळकर, गावचे पाटील श्री. शांताराम कृष्णा पाटील, माजी तालुका पंच सदस्य श्री. अशोक देसाई, श्री. शामराव देसाई, श्री. मारुती तिनैकर, ग्रामपंचायत सदस्य विद्या बुआजी.
डोंगरगावांत श्री. श्रीपाद नाईक यांचे भक्तिभावपूर्ण स्वागत झाले. गांवच्या सुविसिनींनी श्रीपाद नाईक यांची ओवाळणी केली आणि मिरवणुक काढून त्यांना श्री गणेश मंदिराकडे नेण्यात आले.
आपल्या प्रास्ताविक भाषणात श्री. लक्ष्मण देसाई म्हणाले की, श्रीपाद नाईक हे गरीबांचे कैवारी म्हणून परिचित आहेत. गेल्या पंचविस वर्षांपासून त्यांचे या गावांशी अतूट असे नाते आहे. या मंदिराची पायाभरणी त्यांच्यात हस्ते झाली आणि आज त्यांच्याच हस्ते या मंदिराचे उद्घाटन आणि श्री गणेश मूर्तीप्रति÷ापनाही होत आहे, हा दैवयोगच म्हणावा लागेल.
श्रीपाद नाईक राजकारणातील एक सज्जन व्यक्ती :आमदार सौ. निंबाळकर
श्रीपाद नाईक ही राजकारणातील सज्जन आणि ज्ये÷ व्यक्ती असून त्यांच्याबद्दल मला अपार आदर आहे. विकास कामांबाबत त्यांनी कधीच राजकीय भेदभाव केला नाही. कुठल्याही पक्षाचा असो, त्यांनी नेहमीच सहकार्याचा हात पुढे केलेला आहे. खानापूर तालुक्मयाचा अधिक विकास साधण्यासाठी मला त्यांच्या सहकार्याची नेहमी गरज भासणार आहे, अशा शब्दांच खानापूर तालुक्मयाच्या आमदार सौ. अंजलीताई निंबाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
डोंगरगांव येथील दादा मठचे श्री. पिरयोगी भयंकर नाथजी महाराज यांच्या हस्ते मंदिराच्या कळसाची पूजा करण्यात आली व नंतर मंदिरावर कळस बसविण्यात आला.