पणजी : म्हादई अभयारण्य व्याघ्रक्षेत्र करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशास गोवा राज्य सरकारतर्फे आव्हान दिलेल्या विशेष याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली असून गोवा फाऊंडेशन आणि केंद्र सरकारला उत्तर देण्यासाठी नोटीस बजावली आहे. तथापि सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशास कोणतिही स्थगिती दिलेली नाही. याप्रकरणी लवकरच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. गोवा फाऊंडेशनतर्फे सादर करण्यात आलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने म्हादई अभयारण्यासह सभोवतालचा परिसर येत्या 3 महिन्यात व्याघ्रक्षेत्र करण्याचा आदेश दिला होता. तो आदेश राज्य सरकारला मान्य नसल्याने त्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते आणि सदर आदेशास स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे या याचिकेतून करण्यात आली होती. परंतु स्थगिती मिळाली नसली तरी प्रतिवादींना नोटीसा जारी केल्यामुळे याप्रकरणी आता सुनावणी होणार हे निश्चित झाले आहे.
Previous Articleगोव्यात स्टेडियमसाठी बीसीसीआयची भरीव मदत
Next Article सहा महिन्यात नवा ‘टीसीपी’ कायदा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment