प्रतिनिधी /बेळगाव
संपूर्ण देशामध्ये सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ या नवीन योजनेला देशभरातून विरोध होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बेळगाव परिसरातही काही संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत होत्या. काही तरूण कित्तूर चन्नम्मा चौकाकडे दाखल होत होते. त्या तरुणांना पोलिसांनी चौकशी करून ताब्यात घेतले आहे. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
लोकशाहीमध्ये आंदोलन चिरडणे योग्य आहे काय?
लोकशाहीमध्ये आंदोलन करण्यासाठी सर्वांना मुभा आहे.आपल्या न्याय्य हक्कांसाठी कोणीही आंदोलन करू शकतो. मात्र बेळगाव मधील हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करणे हा गुन्हा आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.