प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आयोजित कै. अनिल कानविंदे स्मृती 13 वर्षांखालील वयोगटाच्या रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात रत्नागिरीच्या आर्यन धुळप याने 5 गुणांसह तर मुलींच्या गटात रत्नागिरीच्या सई प्रभुदेसाई हिने 5 गुण मिळवत विजेतेपद पटकावले आहे.
6 फेऱयांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेच्या खुल्या गटात वेद डोईफोडे याने 4.5 गुणांसह उपविजेतेपद प्राप्त केले. ज्योतिरादित्य गडाळे व रुमीन वास्ता यांनी प्रत्येकी 4 गुणांसह तिसरा व चौथा तर चिपळूणच्या सुतेज बेर्डेने पाचवा क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात गुहागरच्या पद्मश्री वैद्यने 4.5 गुणांसह उपविजेतेपद तर रत्नागिरीच्याच ओवी गडाळे, आर्या करकरे व खुशी सावंत यांनी अनुक्रमे तिन ते पाचवी स्थाने प्राप्त केली. विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक प्रवीण सावर्डेकर, रश्मी सावर्डेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दोन्ही गटातील प्रथम दोन क्रमांकाचे खेळाडू राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जिह्याचे प्रतिनिधित्व करतील. बक्षीस वितरण विवेक सोहनी व चैतन्य भिडे यांनी स्पर्धा आयोजन व पंच म्हणून कामगिरी पार पाडली.