सांगरूळ प्रतिनिधी
शाळेतील दैनंदिन कामकाज सुरळीतपणे पार पाडत .गुरुवर्य डी डी आसगावकर कला क्रीडा सामाजिक व शैक्षणिक ट्रस्टच्या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील युवकांसाठी शालेय कामकाजाच्या वेळापत्रकाबाहेर झोकून देऊन काम करत मार्गदर्शकाची भूमिका बजावणाऱ्या उदय चोपडे आणि बाबासाहेब पोवाळकर यांचे तब्बल ३९ विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मुंबई पोलीस मध्ये निवड झाली आहे . गुरुवर्य डी डी आसगावकर ट्रस्टच्या माध्यमातून स ब खाडे महाविद्यालय कोपार्डे येथे सुरू असलेल्या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून आज पी एस आय ,पोलीस, वनरक्षक ,स्टाफ सिलेक्शन ,लिपिक ,तलाठी इत्यादी क्षेत्रात १७५ विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल झाले आहेत.
सांगरूळ शिक्षण संस्थेचे सचिव गुरुवर्य स्व .डी डी आसगावकर यांच्या नावाने सुरू असलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून १९९५ च्या दरम्यान भविष्यातील स्पर्धा परीक्षेचा पाया म्हणून शालेय स्तरावर असणाऱ्या शिष्यवृत्ती एन एम एम एस नवोदय व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेला समाविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात होते .यावेळी श्रीराम ज्युनिअर कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक के बी निंबाळकर यांच्या नियोजनाखाली श्रीराम हायस्कूल व जुनिअर कॉलेज मधील प्राध्यापक व शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात होते.
दरम्यानच्या काळात मूळचे पडळ गावचे असलेले उदय चोपडे हे जून २०१६ ला शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालेत . त्यांनी शाळेच्या दैनंदिन कामकाजात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय नआणता शालेय वेळापत्रकाच्या बाहेर वेळ देत या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून लेखी परीक्षेसाठी आवश्यक असणारी सर्व विषयांची तयारी विद्यार्थ्यांच्या कडून करून घेण्यास सुरुवात केली .शाळा सुरू होण्याअगोदर दररोज सकाळी तीन तास शाळेत उपस्थित राहून स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत .दिवसभरात लहान-मोठी सुट्टी असेल किंवा अध्यापनाचा तास नसेल तेव्हा स्पर्धा परीक्षा केंद्रातील वर्गावर नियंत्रण ठेवत विद्यार्थ्यांच्या कडून अभ्यास करून घेणे असे दैनंदिन कामकाज त्यांनी सातत्याने सुरू ठेवले आहे.
सांगरुळ हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे क्रीडा शिक्षक म्हणून काम करणारे बाबासाहेब पोवाळकर यांनी मैदानावरील तयारी करून घेण्यासाठी जबाबदारी सुरुवातीपासून उचलली .त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत खंड न पडता ते काम करत आहेत .पहाटे साडेपाच पासून सकाळी साडेसात वाजेपर्यंत ते क्रीडांगणावर विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमता चाचणीसाठी आवश्यक ते मार्गदर्शन व सराव करून घेतात .दिवसभर जुनिअर कॉलेज व माध्यमिक शाळेतील आपले कामकाज सांभाळतात .परत सायंकाळी शाळा सुटल्यानंतर मैदानावरील सराव घेण्यास उपस्थित राहतात.
उदय चोपडे आणि बाबासाहेब पोवाळकर यांनी स्वतःला झोकून देत निस्वार्थीपणाने केलेल्या मार्गदर्शनामुळे आज या केंद्राची तब्बल ३९ विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस मध्ये निवड झाली आहे.आज अनेक शाळा मधून अनेक शिक्षक नियमित कामकाज व्यवस्थित करत नाहीत म्हणून संस्थाचालक व शिक्षकांच्या वादाची प्रसंग उद्भवतात .चोपडे व पोवाळकर यांचे काम प्रेरणादायी आहे .संपूर्ण कुंभी कासारी परिसरात या विद्यार्थ्यांच्या बरोबरच मार्गदर्शक उदय चोपडे व बाबासाहेब पोवाळकर यांचे कौतुक होत आहे.या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी गुरुवर्य डीडी आसगावकर ट्रस्टचे अध्यक्ष आमदार जयंत आसगावकर ट्रस्टचे सचिव डी जी खाडे के.बी निबांळकर व सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य व प्रोत्साहन मिळत आहे .
गुरुवर्य डी डी .आसगावकर यांची प्रेरणा
आपल्या परिसरातील संस्थेचा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागामध्ये सेवेत दाखल झाला पाहिजे . आपला माणूस उच्च पदावर असल्यास भागाच्या विकासासाठी त्याचा उपयोग होईल त्या दृष्टीने प्रयत्न करा अशी अपेक्षा गुरुवर्य स्व. डी डी. आसगांवकर यांनी व्यक्त केली .त्यांची प्रेरणा त्यातच उदय चोपडे संस्थेत रुजू झाले आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला गती मिळाली .उदय चोपडे व बाबासाहेब पोवाळकर यांच्या निरपेक्ष कामामुळे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या यशाचा आलेख चढता राहिला.
प्रा के बी निंबाळकर