स्थानिक नागरिकांतून संताप : अर्धवट डांबरीकरण पूर्ण करण्याची प्रवाशांची मागणी
बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर अर्धवट रस्ता केला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. बाची ते महाराष्ट्र हद्दीपर्यंत रस्त्याची पूर्णपणे दयनीय अवस्था झाली आहे. केवळ 200 फुटाचा रस्ता करून उर्वरित रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वाहनधारकांना पुन्हा धक्के खातच मार्गस्थ व्हावे लागणार आहे. त्यामुळे बाचीपासून महाराष्ट्र हद्दीपर्यंत पूर्ण रस्ता डांबरीकरण करावा, अशी मागणी वाहनधारकांतून जोर धरून आहे. तुरमुरीपासून महाराष्ट्र हद्दीपर्यंत रस्त्याची दुर्दशा झाली आहे. पावसाळ्यात पडलेले ख•s अद्याप बुजविण्यात आले नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तुरमुरी गावाजवळ तर पावसाळ्यात तलावाचे स्वरुप येत आहे. दरम्यान, तुरमुरी गावाजवळील काही टप्पा डांबरीकरण करण्यात आला आहे. शिवाय बाची गावाजवळही काही भागाचे डांबरीकरण सुरू आहे. मात्र, तो महाराष्ट्र हद्दीपर्यंत केला जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुन्हा ख•dयातूनच वाहनधारकांना मार्ग काढावा लागणार आहे. बाची ते महाराष्ट्र हद्दीपर्यंत पूर्ण रस्ता डांबरीकरण करावा, अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्ग हा महाराष्ट्र आणि गोवा राज्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून गोव्यासह कोकणातील प्रवाशांची वर्दळ अधिक असते. शिवाय चंदगड तालुक्यातील नागरिक देखील या मार्गावरूनच ये-जा करतात. या मार्गावर रहदारी अधिक आहे. दरम्यान, कर्नाटक हद्दीतील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्यावेळी ख•dयातूनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे लहानसहान अपघात देखील होऊ लागले आहेत. तुरमुरी ते महाराष्ट्र हद्दीपर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, केवळ काही भाग डांबरीकरण करून उर्वरित रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
केवळ 500 फुटाचेच टेंडर
सध्या बाची गावाजवळ रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू आहे. हा रस्ता पूर्ण महाराष्ट्र हद्दीपर्यंत करण्यात यावा, याबाबत कंत्राटदाराला विचारले असता केवळ 500 फुटाचेच टेंडर घालण्यात आले आहे. हा रस्ता महाराष्ट्र हद्दीपर्यंत होणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. बाची गावापासून महाराष्ट्र हद्दीपर्यंत पूर्ण रस्ता डांबरीकरण क्हावा, अशी मागणीही नागरिकांनी लावून धरली आहे.