सुधीर महाबळ यांचे प्रतिपादन : मंथन कल्चरल ऍण्ड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे ‘परतवारी’ विषयावर व्याख्यान
प्रतिनिधी / बेळगाव
आळंदी ते पंढरपूर ही आषाढवारी सर्वांना ज्ञात असून, ती वारकऱयांसाठी भावनिक आहे. काळाच्या ओघात या वारीचे रूप बदलले असून, टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामुळे ती घराघरात पोहोचली आहे. या पारंपरिक वारीमध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी अनेक जाती-धर्माचे भक्त प्रचंड संख्येने सहभागी होतात, असे विचार मुंबई येथील सुधीर महाबळ यांनी मांडले.
मंथन कल्चरल ऍण्ड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे वकील कै. रुस्तुम दारसशा रतनजी उर्फ गोलाखरी यांच्या स्मरणार्थ आयोजित व्याख्यानात ते ‘परतवारी’ या विषयावर बोलत होते. टिळकवाडी येथील वरेरकर नाटय़ संघात रविवारी हे व्याख्यान झाले.
चंद्रज्योती देसाई यांनी ईशस्तवन सादर केले. अध्यक्षा शोभा लोकूर यांनी प्रास्ताविक केले. ऐश्वर्या देसाई यांनी परिचय करून दिला. शोभा लोकूर यांच्या हस्ते सुधीर महाबळ यांचा सत्कार करण्यात आला. सुधीर महाबळ म्हणाले, अलीकडच्या वारीचे स्वरुप बदलले असून, सहभागी होणाऱयांमध्ये शेतकरी वारकऱयांचा सहभाग वाढला आहे. पायी जाणाऱया पंढरीच्या वारीची परंपरा जुनी आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका पालखीत ठेवून ती रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. या वारीत पांडुरंगाचे दर्शन घेण्याचा आनंद वेगळाच असतो. ‘पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, आणीक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी भान विसरून वारीत एकवटतो.
संतश्रे÷ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आहे. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जाती-पातीच्या समाजाला एकत्रितपणे सामावून घेतले. हेच व्यापक स्वरुप जपत पुढे एकनाथ, तुकाराम महाराज आदी संतांनी वारीची परंपरा चालविली.
तरुण भारतच्या पत्रकार मनीषा सुभेदार यांना सुभाष धुमे प्रति÷ानतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सुधीर महाबळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी रसिकश्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अपर्णा देशपांडे यांनी केले. निना जठार यांनी आभार मानले.