महात्मा बसवेश्वरांच्या समानतेचे तत्व सर्वत्र रुजविण्यासाठी सर्व जातीधर्मियांना समान वागणूक देऊन बसवतत्वाचे खरे अनुयायी अशी मुरुघा मठाधीशांची ख्याती होती. लैंगिक अत्याचारांच्या आरोपांमुळे या नावलौकिकाला गालबोट लागले आहे.
बेळगावसह कर्नाटकात गणेशोत्सवाला अमाप उत्साहात प्रारंभ झाला आहे. पुणे-मुंबईनंतर बेळगावच्या गणेशोत्सवाची ख्याती आहे. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले होते. सध्या कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. त्यामुळे गणेशभक्तात मोठा उत्साह दिसून येतो आहे. उत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली. गणेशोत्सवाच्या काळात बेंगळूर येथील चामराजपेठ व हुबळी इदगाह मैदानावर श्रीमूर्तींची प्रति÷ापना करावी, अशी मागणी झाली. बेंगळूरला न्यायालयाने परवानगी दिली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मनाई दिली. हुबळी येथील इदगाह मैदानावर मात्र पालिकेच्या परवानगीने श्रींची प्रति÷ापना करण्यात आली. या मुद्दय़ावरही गेले आठ-पंधरा दिवस आरोप-प्रत्यारोप सुरू होते. हुबळी येथील इदगाह मैदानावर तिरंगा फडकविण्यासाठी हिंदू संघटना व भाजपने आंदोलन छेडले होते. या आंदोलनामुळेच उत्तर कर्नाटकात भाजप रुजला
श्रावण संपला तरी कर्नाटकात पावसाचा जोर कमी झाला नाही. ऐन गणेशोत्सवात अनेक शहरातील जनजीवनावर पावसामुळे परिणाम झाला आहे. गेल्या दोन महिन्यातील पावसामुळे 7 हजार 548 कोटी रुपयांची आर्थिक हानी झाली आहे. तर संपूर्ण राज्यातील 96 जणांचा बळी गेला आहे. 22 हजार 734 किलोमीटर रस्त्यांची वाताहत झाली आहे. 1 हजार 471 पुलांचे नुकसान झाले आहे. 199 तलावांनाही धक्का पोहोचला आहे. केंद्र सरकारकडे 1 हजार 12 कोटी रुपये भरपाई मिळविण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. महसूलमंत्री आर. अशोक यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या दोन दिवसात कर्नाटकाची राजधानी बेंगळूर, रामनगर, चामराजनगर, तुमकूर, चिक्कबळ्ळापूर, चित्रदुर्ग, बळ्ळारी, विजयनगर, हावेरी, कोप्पळ, गदग, धारवाडसह पंधरा जिल्हय़ात पावसाचा जोर सुरू आहे. त्यामुळे निम्मे राज्य गारठले आहे. कोडगूसारख्या जिल्ह्यात भूस्खलनाचे प्रकार सुरू आहेत. पर्यटन व्यवसायावर या जिल्हय़ाचे आर्थिक गणित अवलंबून आहे. पाऊस आणि त्यामुळे झालेल्या वाताहतीमुळे पर्यटन व्यवसायालाही फटका बसला आहे.
गणेशोत्सवाच्या उत्साहात असणाऱया कर्नाटकाला धक्का बसेल, अशी आणखी एक माहिती बाहेर पडली आहे. शेतकऱयांच्या आत्महत्यात कर्नाटक देशात दुसऱया क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती हाती आली आहे. महाराष्ट्र व कर्नाटक शेतकरी व विणकरांच्या आत्महत्या प्रकरणात नेहमीच चर्चेत असतात. आत्महत्या वाढल्या की त्या कशा रोखाव्यात, याची चर्चा होते. प्रत्यक्षात अन्नदात्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस कार्यक्रम राबविले जात नाहीत. सरकार कोणाचेही असो, शेतकऱयांच्या आत्महत्येच्या मुद्दय़ावर केवळ राजकारणच केले जाते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे शेतकरी, कामगार, कष्टकरी, मध्यमवर्गीयांची आर्थिक गणिते कोलमडली. एकदा घडी विस्कटली की ती नीट बसविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत शेतकऱयांच्या आत्महत्या प्रचाराचा मुद्दा बनू शकतो.
सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ मिळविण्याचे गणित सर्वच नेत्यांनी मांडले आहे. गेल्या आठवडय़ात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. खरेतर वयाच्या कारणामुळे कर्नाटकात येडियुराप्पा युग संपले, अशी परिस्थिती होती. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त दावणगेरी येथे जमलेल्या गर्दीमुळे येडियुराप्पा यांना पुन्हा चांगले दिवस आले आहेत. संसदीय समितीत त्यांची नियुक्ती झाली आहे. जादुई आकडा गाठण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कर्नाटक दौरे वाढविण्याची विनंती कर्नाटकातील नेत्यांनी केली आहे. कारण स्थानिक नेत्यांवरील आरोप लक्षात घेता सत्तेवर येणे तर दूर, विरोधी पक्ष बनण्यापर्यंतही संख्याबळ मिळणार नाही, याची खात्री पटल्यानेच नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा लाभ उठविण्याचे पक्षाने ठरविले आहे. शुक्रवारी 2 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मंगळूर दौऱयावर येत आहेत. विविध विकासकामांना चालना देण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे. मंगळूर व शिमोगा सध्या जातीय कारणांनी देशभरात गाजत आहेत. अशा शहरात पंतप्रधानांचे कार्यक्रम आयोजित करून आपली व्होटबँक मजबूत करण्याचे भाजपचे डावपेच आहेत.
कर्नाटकात सध्या आणखी एक मुद्दा गाजतो आहे. चित्रदुर्ग येथील मुरुघा मठाच्या स्वामीजींवर त्यांच्याच विद्यार्थिनी वसतीगृहात शिक्षण घेणाऱया दोन अल्पवयीन मुलींनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. म्हैसूर येथील वडनाडी संस्थेच्या मदतीने स्वामीजींवर पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. समाजातील जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी मुरुघा मठाधीशांचा नेहमी पुढाकार राहिला आहे. महात्मा बसवेश्वरांच्या समानतेचे तत्व सर्वत्र रुजविण्यासाठी सर्व जातीधर्मियांना समान वागणूक देऊन बसवतत्वाचे खरे अनुयायी अशी मुरुघा मठाधीशांची ख्याती होती. लैंगिक अत्याचारांच्या आरोपांमुळे या नावलौकिकाला गालबोट लागले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून मुरुघा मठाधीश व मठाचे क्यवस्थापक बसवराजन यांच्यात धूसफूस सुरू होती. याच कारणामुळे आपल्याविरुद्ध षड्यंत्र रचल्याचे स्पष्टीकरण स्वामीजींनी दिले आहे. अनेक मातब्बर राजकीय नेत्यांची या मठात ऊठबस असते. त्यामुळे राजकीय नेत्यांनी अत्यंत सावधगिरीने प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटकातील अनेक मठाधीश मुरुघा मठाधीशांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱया अल्पवयीन मुलींनी न्यायाधीशांसमोर आपल्यावर झालेल्या अत्याचारांचा पाढा वाचला आहे. तब्बल पाच तास या मुलींनी जबानी दिली आहे. या जबानीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे. डॉ. शिवमूर्ती मुरुघा स्वामीजींवर झालेल्या गंभीर आरोपांमुळे कर्नाटकातील मठाधीश व पुरोगामी विचारवंतही बुचकळय़ात पडले आहेत. कारण जातीभेद मिटविण्यासाठी कार्यरत असणाऱया मुरुघा मठाधीशांवरील झालेले आरोप गंभीर आहेत. मुरुघा मठाधीशांना पाठीशी घालणारे मठाधीश व राजकीय नेत्यांचा वडनाडी या सेवाभावी संस्थेच्या प्रमुखांनी समाचार घेतला आहे. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
आधी चौकशी तर होऊ द्या. चौकशीतून जे सामोरे येईल, त्यानंतर याविषयी भूमिका घ्या, असा सबुरीचा सल्ला दिला आहे. मुरुघा मठाधीशांसह चौघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. हे प्रकरण कोठवर जाऊन पोहोचणार, हे चौकशीअंती स्पष्ट होणार आहे.