ऑनलाईन टीम / तरुण भारत :
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह 25 कार्यकर्त्यांना बुलढाणा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आज संध्याकाळीच सुटका होण्याची शक्यता आहे.
कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन तुपकरांनी आक्रमक भूमिका घेतली होती. शनिवारी त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलिसांनी तुपकरांसह आंदोलनकर्त्यांवर लाठी चार्ज करत 25 जणांना अटक केली होती. त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज बुलढाणा न्यायालयाने तुपकरांसह 25 जणांना जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, तुपकरांच्या आंदोलनानंतर सरकार खडबडून जागे झाले असून, पीक विम्याची रक्कम आता शेतकऱयांच्या खात्यात जमा होत आहे.
अधिक वाचा : ठरलं! कसबा पोटनिवडणुकीत मनसे देणार भाजपला साथ