बांदा / प्रतिनिधी-
गणेशोत्सव तोंडावर आला असताना शहरात विजेच्या समस्या वाढत आहेत. वीज वारंवार खंडित होणे, विजेचा दाब कमी होणे त्यामुळे ग्राहकांना विजेच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.तसेच बांदा बाजारपेठ असल्याने विजेच्या लपंडावामुळे त्याचा परिणाम व्यापारावर होत आहे. आपल्या माध्यमातून लवकरात लवकर यावर उपाययोजना करुन वीजपुरवठा सुरळीत करावा जेणेकरून गणेशोत्सव आनंदात साजरी होईल .अशी मागणी बांदा शहर भाजपा शहराध्यक्ष बाबा काणेकर बांदा येथील विजवितरणचे अभियंता कोहळे यांच्याकडे केली. तात्काळ याबाबत ठोस उपाययोजना न केल्यास आपणास ग्रहांकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे .