सीमावासियांचे सुनावणीकडे लक्ष
बेळगाव : बेळगाव सीमाप्रश्नाची सुनावणी मंगळवार दि. 30 रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. तब्बल पाच वर्षांनंतर सीमाप्रश्नाची सुनावणी असल्यामुळे संपूर्ण सीमावासियांचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. कोरोना तसेच विविध कारणांनी गेले काही महिने सीमाप्रश्नाची सुनावणी झाली नव्हती. मध्यंतरीच्या काळात ऑनलाईन सुनावणी होणार असल्याची चर्चा होती. परंतु ऑनलाईन सुनावणीही न झाल्यामुळे बऱयाच दिवसांच्या कालावधीनंतर मंगळवारी सुनावणी होणार आहे. 2017 नंतर प्रथमच ही सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र
सरकारच्या बाजूने ज्ये÷ वकील ऍड. राजेश द्विवेदी, ऍड. शिवाजीराव जाधव बाजू मांडणार आहेत.