ऑनलाईन टीम/तरुण भारत
Bharat Jodo Yatra : काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रे’ चा आज महाराष्ट्राताल १४ वा दिवस आहे. तर आज २० नोव्हेंबर हा महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा शेवटचा दिवस असणार आहे. या दिवशीही जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघातही यात्रा असणार आहे. त्यानंतर जळगाव जामोदमार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. काल रात्रीचा मुक्काम या यात्रेनं भेंडवळ या गावी केला. त्याआधी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण केली.
गेली १४ दिवस राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधून पायी चालले. दरम्यान आज ते जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्रातील यात्रेचा शेवट करणार आहे. यानंतर जळगाव जामोदमार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. काल रात्री भेंडवळ या गावात त्यांनी मुक्काम केला. यावेळी राहुल गांधी यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहिली.
राहुल गांधींच्या आजच्या यात्रेचा कार्यक्रम
सकाळी ६ वाजता – भेंडवळमधून पदयात्रा सुरु झाली.
सकाळी १० वाजता – सातपुडा एज्युकेशन सोसायटी परिसर, जळगाव जामोद, जि. बुलढाणा येथे यात्रा
पोहचली.दुपारी ४ वाजता – पदयात्रा संविधान चौक, जळगाव जामोद, जि. बुलढाणा येथे असेल.सायंकाळी ७ वाजता – निमखेडी पोलीस चौकीजवळ, जळगाव जामोद, जि. बुलढाणा या शेवटच्या ठिकाणी यात्रा पोहचेल.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आणि भारत जोडो यात्रेचे समन्वयक बाळासाहेब थोरात आज सकाळी १०.३० वा. जळगाव (जामोद) येथे पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधी यांनी शनिवारी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण केली. त्यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बोलताना त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारने आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना व शेतीला उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे आणले होते. या जुलमी कायद्यांविरोधात देशातील शेतकऱ्यांनी आवाज बुलंद करत दिल्लीला घेराव घालून ऐतिहासिक आंदोलन केले. मोदी सरकारला अखेर शेतकऱ्यांच्या आवाजासमोर झुकावे लागले व तीन काळे कायदे रद्द करावे लागले, या घटनेला आज एक वर्ष झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर 733 बळी टाळता आले असते असे खासदार राहुल गांधी यांनी म्हटले.