केंद्र–राज्य सरकारचे यश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभर यात्रा
वार्ताहर /काकती
भाजप प्रगती रथयात्रेचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारचे यश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभरात सदर रथयात्रा काढली आहे. येथील मध्यवर्ती होळी चौकात रथयात्रेचे भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी स्वागत केले. या कार्यक्रमात युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष सुशांत परमोजी यांनी रथयात्रेची माहिती दिली. भाजप युवा नेते मारुती अष्टगी भाजपच्या योजनांची माहिती देताना म्हणाले, महिलांना स्वयंपूर्णता योजनेतंर्गत कर्ज, युवकांना स्वयंरोजगार योजना, महिला व विद्यार्थ्यांना मोफत बसपास, कृषी कामगारांना दरमहा 1 हजार रुपये दिले जात आहे. तसेच पीएम किसान सन्मान योजनेचा 2 हजार रुपयांचा हप्ता न मिळालेल्या शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्यावे. राज्यभरातून 130 रथाची मिरवणूक प्रत्येक खेड्यापर्यंत पोहचून सर्वांना भाजपच्या संकल्पनाची जाणीव देणार आहे, असे असे त्यांनी सांगितले. यावेळी गावातील भाजप नेत्यांसह ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.