शाहुवाडी प्रतिनिधी
वाहनांची वर्दळ माणसांची ये- जा दुचाकी धारकांची लगबग यातच ब्रेक फेल ट्रकची एन्ट्री पण चालकाचे प्रसंगावधान आणि दुचाकी धारकांनी बाळगलेली सतर्कता यामुळेच अनर्थ टाळला. बुधवारी दुपारी मलकापूर शहरात दुपारी घडली घटना
वेळ दुपारची कोल्हापूर रत्नागिरी- महामार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. आज मलकापूर शहरात रत्नागिरीहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकचा ब्रेक फेल झाला. उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून ट्रकची धडक बसली. त्यामुळे ट्रकवरिल चालकाचे नियंत्रण सुटले. दरम्यान ट्रकच्या समोर असलेल्या दुचाकी धारकांनी सतर्कता घेऊन गाडी बाजूला घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. घडलेल्या घटनेने महामार्गावर एकच गलका होउन ट्रॅफिक जाम झाले.
अपघाताची घटना समजताच शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुयश पाटील ‘कॉन्स्टेबल पाटील ‘ होमगार्ड नारायण पाटील यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.