तापाचे रुग्ण करताहेत खासगी प्रयोगशाळेत तपासणी : जंतुनाशक औषधांची फवारणी करूनही डेंग्यूचा फैलाव : नागरिकांत भीतीचे वातावरण
प्रतिनिधी / वाळपई
सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागलेली आहे. आरोग्य खात्याची यंत्रणा सतर्क झाली, मात्र वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयातील रक्त तपासणी यंत्रणा बिघडल्यामुळे अनेक जण खासगी लॅबमध्ये जाऊन तपासणी करीत आहेत. यामुळे वाळपई सरकारी समाजिक रुग्णालयातील डेंग्यूच्या रुग्णांचा अधिकृत आकडा कमी असला तरी प्रत्यक्षात तो आकडा जास्तही असू शकतो. नगरपालिका क्षेत्रातही डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
सत्तरी तालुक्मयात एकूण पाच गावांमध्ये आतापर्यंत डेंग्यूचे संक्रमण झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आरोग्य खात्याची यंत्रणा आपल्यापरीने प्रयत्न करीत असली तरीसुद्धा अजून पर्यंत नियंत्रण प्राप्त झालेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयाच्या एकूण आकडेवारीनुसार आतापर्यंत 43 रुग्ण आढळून आले. तरीसुद्धा सदर रुग्णालयात उपचारासाठी न जाणाऱया रुग्णांची संख्या जास्त असल्याचे चित्र आहे.
सरकारी रुग्णालयातील रक्त तपासणी यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून बिघडलेली आहे. यामुळे वाळपई सरकारी रुग्णालयात रक्ताचे नमुने अन्यत्र तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. त्याला किमान दोन दिवसांचा अवधी लागत आहे. यामुळे रुग्णांची नेमकी आकडेवारी रुग्णालयाकडे उपलब्ध नाही. सध्याच्या आकडेवारीनुसार 43 सत्तरी तालुक्मयाच्या एकूण पाच गावांमध्ये आढळून आलेले आहेत. मात्र खासगी प्रयोगशाळेत अनेक रुग्ण तपासणी करून घेत आहेत. यामुळे या रुग्णांची संख्या जास्तही असू शकते.
वाळपई नगरपालिका क्षेत्रात रुग्णांमध्ये वाढ
वाळपई नगरपालिका क्षेत्रातही मोठय़ा प्रमाणात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वाळपई सरकारी रुग्णालयातील रक्त तपासणी यंत्रणा बिघडल्यामुळे तापाचा रुग्ण खासगी लॅबमध्ये जाऊन रक्त तपासणी करून घेत आहे. यामुळे त्यांना डेंग्यूचे निदान झाल्यानंतर तो खासगी डाक्टरांकडे उपचार घेत आहे. यामुळे ही आकडेवारी सरकारी रुग्णालयाकडे नाही. दरम्यान, नगरपालिका क्षेत्रात अद्याप जंतुनाशक औषधांची फवारणी हाती घेण्यात आलेले नाही, याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आरोग्य खात्याची डोकेदुखी वाढली
डेंग्यूचे संक्रमण वाढलेल्या भागात प्रामुख्याने औषधांच्या फवारणीवर भर देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी औषधांची फवारणी केलेल्या त्या ठिकाणीसुद्धा डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यामुळे औषधांची फवारणी ही डेंग्यूच्या वाढत्या रोगावर नियंत्रण राखू शकलेली नाही असे प्रथमदर्शी आढळून आलेले आहे. यामुळे आरोग्य खाते आता डेंग्यू नियंत्रणासाठी कोणती उपाययोजना हाती घेते, हे पहावे लागणार आहे.