स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात गावाला रस्त्याची सुविधा : ग्राम सडक योजनेतून 6 कोटी 50 लाखाचा निधी, दुर्गम गावांचा होणार विकास
वार्ताहर / जांबोटी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात खानापूर तालुक्मयाच्या पश्चिम भागातील दुर्गम प्रदेशात वसलेल्या चापोली, कापोली के. सी, मुडगई, चिरेखानी आदी गावांना रस्त्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. दोन वर्षांपूर्वी या रस्त्यांच्या निर्मितीसाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत 6 कोटी 56 लाखाचा निधी मंजूर केला होता. रस्त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
जांबोटीपासून चापोली गावापर्यंतचे अंतर सुमारे 8 किलोमीटर आहे. मात्र या गावची रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्यामुळे रस्त्याअभावी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात तर या गावातील नागरिकांना रस्त्याअभावी नरक यातना सोसाव्या लागत होत्या. हा संपूर्ण परिसर घनदाट जंगल भागात वसल्यामुळे तसेच या भागाचा समावेश पर्यावरणदृष्ट्या अति संवेदनशील क्षेत्रात होत असल्याने या गावाच्या रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून लालफितीत अडकला होता.
उन्हाळ्यात रस्त्याची श्र्रमदानातून तात्पुरती दुऊस्ती करून गावकरी हा रस्ता वाहतुकीयोग्य बनवत होते. मात्र पावसाळ्यातील चार महिने या रस्त्यावरून दुचाकी चालविणे देखील कठीण होत असल्यामुळे चापोलीवासियांना रस्त्याअभावी जांबोटीपर्यंत 8 किलोमीटर अंतर रात्री अपरात्री पायपीट करावी लागत होती. तसेच हा संपूर्ण रस्ता घनदाट जंगल प्रदेशातून गेल्यामुळे या रस्त्यावर वाघ, अस्वले, बिबट्या, गवीरेडे आदी हिंस्त्र प्राण्यांचा राजरोसपणे वावर असल्यामुळे शालेय विद्यार्थी, महिला वर्गाना तर जीवमुठीत घेऊन पायपीट करावी लागत होती, रस्त्याअभावी या भागातील नागरिकांना आदिवासीप्रमाणे जीवन कंटावे लागत होते.