शिवसेनेतील बंडाळीनंतर दोन्हीगट एकमेकावर सातत्याने आरोप- प्रत्यारोप करत आले आहेत. आदित्य ठाकरे नेहमीच आक्रमक युवासेनेते नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर आरोप करताना हे लोक पैशासाठी भाजपबरोबर गेले असल्याचे कारण सांगून केंद्रिय तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी ते भाजपबरोबर गेल्याचा आरोप केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर आरोप करताना उद्धव ठाकरे म्हणाले “सध्याचे मुख्यमंत्री हे बंडखोरीपूर्वी आमच्या घरी म्हणजे मातोश्रीवर आले होते. आपण भारतीय जनता पक्षासोबत न गेल्यास मी तुरुंगात जाईन असे सांगून ते रडत होते,” असा दावा आदित्य ठाकरे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला.
शिंदे आणि त्यांच्या 40 समर्थक आमदारांनी का बंडखोरी केली हे सांगताना ते म्हणाले, “त्यांना फक्त त्यांच्या जागा वाचवण्यासाठी आणि पैशासाठी त्यांनी शिवसेना सोडली दुसरे काही कारण नाही.” असे ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना शिवसेनेचे खासदार संजय राउत म्हणाले, “एकनाथ शिंदे हे केंद्रीय यंत्रणांच्या रडारखाली होते. अर्ध्याहून अधिक आमदार सीबीआय, ईडी किंवा आयटीडीच्या कारवाईच्या दबावाखाली होते. भाजपने त्यांना बंड करण्यास भाग पाडून नऊ महिन्यांत महाविकास आघाडीचे सरकार पाडले.” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.