नवी दिल्ली
हुवाई आणि झेडटीइ सारख्या चीनी दूरसंचार उपकरण निर्मात्यांना विश्वसनीय स्त्राsत प्रमाणपत्र देण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. त्यामुळे या कंपन्यांना सध्यातरी भारतीय बाजारापासून दूर राहावे लागणार आहे,
अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळते आहे.
कारण हा मुद्दा अलीकडेच चर्चेसाठी आला होता, परंतु राष्ट्रीय सुरक्षेची चिंता लक्षात घेऊन या कंपन्यांना आत्तापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दूरसंचार सेवा प्रदात्यांनी अलीकडेच अनौपचारिकपणे सरकारला या मुद्यावर विचार करण्याची विनंती केली हेती. जेणेकरून काही श्रेणीतील दूरसंचार उपकरणे चीनमधून आयात करता येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
भारतात 4 जी आणि 5 जी नेटवर्क विस्तारल्यामुळे खर्च वाढेल, असे कंपन्यांनी म्हटले आहे. विश्वसनीय स्त्राsत सुरक्षित केल्याशिवाय चीनी कंपन्या भारतीय बाजारपेठेत नेटवर्क उपकरणे पाठवू शकत नाहीत. त्यांनी बनवलेल्या उत्पादनांनाही विश्वासार्ह उत्पादने म्हणून मान्यता मिळालेली नाही.
भारताने चीनच्या अनेक अॅप्सवर बंदी घातली असली तरी या कंपन्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली नाही. आवश्यक मान्यतेशिवाय त्यांना भारतीय बाजारपेठेत सिमेन्स, सिस्को आणि सॅमसंगसारख्या कंपन्यांशी स्पर्धा करणे सोपे जाणार नाही.
दूरसंचार विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘देशात 5जी सुरू झाल्यामुळे दूरसंचार क्षेत्र अत्यंत संवेदनशील आहे आणि गंभीर टप्प्यातून जात आहे. व्यापक आर्थिक आणि औद्योगिक बदलांना गती देणारी उपकरणे केवळ तांत्रिकदृष्ट्या योग्य नसून ती विश्वसनीय स्त्राsताकडून पुरवली गेली पाहिजेत. या समस्येचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे परंतु याक्षणी नैतिक भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही.’
एप्रिलच्या सुरुवातीस, व्होडाफोन आयडियाने काही मंडळांमध्ये 4जी नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी झेडटीइसोबत ऑर्डर दिल्याचे वृत्त आले होते. पंरतु कंपनीने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
अधिकाऱ्यांनी सांगितले की खासगी क्षेत्रातील दूरसंचार सेवा प्रदात्यांपैकी एकाही कंपनीने आतापर्यंत कोणत्याही अनधिकृत कंपनीकडून उपकरणे खरेदी केलेली नाहीत.