ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिंदे गटाने केलेल्या गुवाहाटी दौऱ्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी शनिवारी बुलढाण्यात घेतलेल्या सभेमध्ये शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर आणि कामाख्या देवीच्या मंदिरातील दर्शनावर खोचक टीका केल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खोचक टोला लगावला आहे.
बुलढाणा येथे शनिवारी झालेल्या चिखली येथील शेतकरी संवाद मेळाव्यात शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलेल्या ४० हून आमदार आणि खासदारांना रेड्याची उपमा दिली. आज रेडे गुवाहाटीला गेलेत, महाराष्ट्रातील देव संपले का? अशी जहरी टीका राऊतांनी केली. तर उद्धव ठाकरे यांनीही शिंदे गटाचा उल्लेख खोके सरकार आणि रेडे असा केला. ज्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंची मानसिकता ढसळलेली, नैराश्यातून ते अशाप्रकारची वक्तव्य करत असल्याची टीका करत कंटनेर भरून खोके कुणाकडे गेले हे सर्वांना माहित अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री शिंदेंचे ठाकरे सरकारवर केली आहे.
हे ही वाचा : तुमचे भवितव्य ठरवणारे दिल्लीत बसलेत; उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदेंवर टीकास्त्र
दरम्यान, केसरकरांच्या आरोपांवर बोलताना एकनाथ शिंदेंनी फ्रीजच्या आकाराच्या कंटेनरमधून पैसे पोहोच झाल्याची अप्रत्यक्ष टीका केली. “सगळ्या जगाला माहिती आहे की हे जे बोलतायत, ते छोटे छोटे खोके आहेत. मोठे खोके घेण्याची ऐपत आमदारांची आहे का? फ्रीजएवढ्या कंटेनरमधले खोके कुणाकडे जातात आणि ते कोण पचवू शकतं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. एक दिवस हे सगळं जनतेच्या समोर येईल. केसरकरांनी हे सूचक विधान केलं आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरेंकडून काय अपेक्षा करणार
गुवाहाटीवरून मुंबईमध्ये दाखल होत असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलत होते. राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंकडून काय अपेक्षा करणार, त्यांची मानसिकता ढसळलेली आहे, त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे, नैराश्येतून त्यांच्याकडून अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत. मला वाटत होतं की, नैराश्य येण्यासाठी त्यांना वेळ लागले, पण ते अगोदरचं आलं आहे.