प्रतिनिधी, रत्नागिरी
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने बारसू आंदोलकांवरील ३५३ कलम रद्द केल्याची माहिती पालकमंत्री तथा उद्योगमंत्री मंत्री उदय सामंत दिली.लवकरच रिफायनरी विरोधकांसोबत बैठक घेण्यात येईल त्याबाबत आज सर्वांना चर्चेची नोटीस दिली आहे, जो गैरसमज पसरला जातोय त्याची माहिती देण्यात येणार आहे. पोलीस दबावाचा वापर करतात हा गैरसमज पसरवला जात आहे.याबाबत मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा झाली, प्रशासनांना चार पावलं पुढे जाऊन निर्णय घेतला आहे सर्व आंदोलन करत्यांना सोडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले की, जमीन खरेदी करण्यामध्ये शासनाचे काही अधिकारी असल्याचा आरोप होत आहे. त्याची लवकरच चौकशी करण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून एक सदस्य समिती नेमली जाईल. महावितरणच्या अधिकाऱ्यांने जमीन खरेदी केली आहे त्या अधिकाऱ्याची हेडकॉटरला बदली करण्यात आली आल्याची माहिती सामंत यांनी दिली.
रिफायनरी बाबत 2 ते 3 तारखेला मुंबईत बैठक होणार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा या संदर्भात चर्चा करणार आहोत. उद्धव ठाकरे यांना काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील. तसेच शरद पवारांप्रमाणे इतर काही पक्षांचे नेते असतील त्यांचा गैरसमज दूर केला जाईल असेही सामंत यांनी सांगितले . प्रशासनाकडून शेतकऱ्यांना कुठेही त्रास देण्याचा प्रयत्न नाही.बारसू येथे माती परीक्षण झाल्यानंतरच प्रकल्पाच निश्चित होईल. हा प्रकल्प रेटून पुढे जाणार नाही. मुळात ग्रीन रिफायनरी बेरोजगारी दूर करणारा हा प्रकल्प आहे. आंदोलक कार्यकर्त्यांसोबत संयमाने चर्चा करण्यात येईल. ग्रामस्थांसोबत सुद्धा बोलणार आहोत. रिफायनरी बाबत बाहेरच्या लोकांची आवश्यकता नाही. कोकणातल्या लोकांनी कोकणातले निर्णय घ्यावेत.पत्रकार परिषद घेऊन बारसुमधील लोकांची माथी भडकावण्यात आली.आंदोलन पेटवणे योग्य नाही. आम्ही गावागावात लोकांना प्रांत ऑफिसमध्ये बोलावून प्रकल्पाची माहिती देणार आहोत असे ही सामंत यांनी सांगितले.