सातारा प्रतिनिधी
कायम वादाच्या भवऱ्यात अडकलेला आनेवाडी टोल नाका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संत ज्ञानेश्वर माऊली च्या पालखीमध्ये सहभागी होणारे वारकऱ्यांना आनेवाडी टोल नाक्यावर टोल साठी अडवण्यात आले रिलायन्सच्या रघुविर सिंह या अधिकाऱ्यांने वारकऱ्यांच्या गाड्यांच्या टोल वसुली साठी अडवल्यामुळे गाडीतील सर्व वारकरी आंदोलनाच्या पवित्र मध्ये उतरले व काही वेळ टोल नाका थांबून ठेवला थोड्याच वेळामध्ये भुईंज पोलीस स्टेशनचे स पो नि गर्जे यांनी मध्यस्थी करून गाड्या सोडून दिल्या व वाहतूक करून दिली.