राहुल गांधींना लोकसभेतून अपात्र ठरवल्याबद्दल राजघाट येथे चालु असलेल्या काँग्रेसच्या सत्याग्रहात काँग्रेस सरचिटणीस (Congress general secretary) प्रियंका गांधी- वाड्रा (Priyanka Gandhi-Vadra) यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भित्रे असून हिंदू संस्कृतीत ज्याप्रमाणे सर्व गर्विष्ठ राजे पराभूत होतात. त्याचप्रमाणे त्यांचा पराभव अटळ असल्याचे म्हटले आहे. तसेच मला तुरुंगात टाकले तरी हरकत नाही पण आमचे पंतप्रधान घाबरले आहेत असच म्हणेन असा थेट निशाणा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर केला.
कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांना मिळालेल्या शिक्षेमुळे लोकसभेच्या संसदिय सचिवालयाने त्यांच्यावर सदस्यत्व रद्दची कारवाई केली. या कारवाईच्या निषेदार्थ कॉंग्रेसकडून दिल्लीमध्ये निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना प्रियंका गांधी- वाड्रा म्हणाल्या, “माझ्यावरही गुन्हा दाखल करून मला तुरुंगात टाका. तरीही मी म्हणेन की आमचे पंतप्रधान भित्रे आहेत.” असेही त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या “तुम्ही माझ्या शहीद वडिलांचा संसदेत अपमान केला. तुम्ही त्यांच्या मुलाला मीर जाफर म्हणाता. तुम्ही माझ्या आईचा अपमान केला. तुमचा एक मुख्यमंत्री म्हणतो की राहुल गांधींना त्यांचे वडील कोण आहेत हे देखील माहित नाही. पंतप्रधान माझ्या संपूर्ण कुटुंबाचा अपमान करत आहेत.” असा आरोप त्यांनी पंतप्रधानांवर केला.