‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींचे देशाला संबोधन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’च्या 101 व्या भागाचे प्रसारण रविवारी करण्यात आले. या भागाच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांनी 100 व्या भागाला जगभरातून मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे प्रसारण होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांशी संवाद साधतात. मन की बातच्या 101 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी युवा संगम, देशाचे संग्रहालय, जलसंधारण आणि सावरकरांची जयंती यावर भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात आजच्या भागात युवा संगम या कार्यक्रमाविषयी चर्चा केली. युवा संगममध्ये तऊण इतर राज्यातील शहरे आणि गावांमध्ये जातात, त्यांना विविध प्रकारच्या लोकांना भेटण्याची संधी मिळते. अशा भेटी-गाठींमधून झालेल्या जडण-घडणीतून त्यांचा विकास होत जाईल, असे मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी काही तऊणांशी संवादही साधला. यादरम्यान अऊणाचल प्रदेशातील ग्यामर न्योकुम या विद्यार्थ्याशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी युवा संगम या कार्यक्रमावार त्याला ब्लॉग लिहिण्याचा सल्ला देत स्वत:चे अनुभव सांगण्यास सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी आपल्या जपान दौऱ्याचा देखील उल्लेख केला. काही दिवसांपूर्वी मी जपानच्या दौऱ्यावर गेलो होतो आणि तिथे मला हिरोशिमामधील पीस मेमोरिअलमध्ये जाण्याची संधी मिळाली. हा एक भावनिक क्षण होता. जेव्हा आपण इतिहासातील गोष्टींची जपवणूक करतो तेव्हा पुढील पिढीला त्या गोष्टी खूप मदत करतात, असेही त्यांनी सांगितले.