विद्यार्थी-नागरिक मोठया संख्येने सहभागी
कोल्हापूर : प्रतिनिधी
सामाजिक न्याय विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान रॅलीची’ सुरुवात बिंदू चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, सहायक आयुक्त समाजकल्याण विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी सचिन साळे, प्रांताधिकारी वैभव नावडकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. एन शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ.चंद्रकांत साखरे उपस्थित होते.
शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व जिह्यातील विविध शासकीय विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित नशामुक्ती भारत अभियानाचे उद्धघाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राहूल रेखावार म्हणाले “26 नोव्हेंबर या दिवसाच महत्व केवळ भारतालाच नाही तर संपुर्ण जगाला आहे. आपल्या सर्वांना एकाच समान धाग्यात बांधण्याचे काम भारताच्या संविधानाने केले आहे. संविधानातील मुल्ये प्रत्येकाने अंगिकारून ती आचरणात आणली पाहिजे.” असे ते म्हणाले. तसेच संविधानातील विचार घरोघरी पोहोचवण्याचे काम प्रशासन हाती गेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
संविधान रॅलीमध्ये जिह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी, एन.सी.सी., एन.एस.एस, स्काऊट गाईड, विद्यार्थी तसेच सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्या अधिनस्त असणाया शासकीय वसतिगृहे, आश्रम शाळामधील पाच ते सहा हजार विद्यार्थी-विद्यार्थीनी पारंपारिक वेशभुषा परिधान करुन तसेच जिह्यातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नागरिक संविधान रॅलीमध्ये सहभागी झाले होते. संविधान दिनाच्या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. रेखावार व पोलीस अधीक्षक श्री. बलकवडे यांनी चित्ररथास हिरवा झेंडा दाखवून केले.