जळगाव / प्रतिनिधी :
जामनेर नगरपालिकेच्या नगरसेवकांना आपल्या प्रभागातील विकासकामांचा विसर पडला आहे. ही बाब लक्षात आणून देण्यासाठी नाराज जनतेने मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या बजरंगपुरा परिसरातील घराजवळ “आमचे नगरसेवक हरवले आहेत. जनता त्रस्त, नगरसेवक मस्त,” असे फलक लावले आहेत.
जामनेर नगरपालिकेत भाजपाची सत्ता असून, 20 पैकी 20 नगरसेवक भाजपचे आहेत. गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे शहरात वेगाने विकास होईल, अशी लोकांना अपेक्षा होती. मात्र, नगरसेवकांना शहरातील विकासकामांचा विसर पडल्याने नागरिकांची ही अपेक्षा फोल ठरत आहे. शहरातील नागरिकांच्या लहान-सहान समस्याही सोडवल्या जात नसल्याचा आरोप होत आहे.
अधिक वाचा : मनसे नेते वसंत मोरे पुन्हा नाराज?
आपापल्या प्रभागातील प्रश्न सोडवण्यात हे नगरसेवक अपयशी ठरले आहेत. लोकांमध्ये असलेली नाराजी थेट गिरीश महाजनांच्या लक्षात आणून देण्यासाठी नाराज जनतेने हे फलक लावल्याचे सांगण्यात येते.