कामास प्रारंभ ः जमिनीच्या उष्णतेने विजेची होणार निर्मिती
वृत्तसंस्था/ लेह
भारत आणि आइसलँडच्या इंजिनियर्सनी लडाखच्या पुगामध्ये देशातील पहिलया जियोथर्मल प्रकल्पावर काम सुरू केले आहे. या प्रकल्पाचे प्रारंभिक निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. जियोथर्मल प्रकल्पात जमिनीतील उष्णता पाण्याला वाफेत बदलण्यासाठी वापरली जाते, ज्यानंतर विजेची निर्मिती होत असते.
जियोथर्मल वीज चोवीस तास उपलब्ध होत असते. भारतात अनेक उष्ण पाण्याचे झरे असून त्यांच्यातील तापमान विजनिर्मिती करण्याची क्षमता बाळगून आहे. अशा सर्व ठिकाणांपैकी लेह लडाखनजीक पुगा सर्वात सवांत मोठे सर्वात आश्वासक जियोथर्मल ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून 4400 मीटरच्या उंचीवर असणारा पुगा हे लेहपासून 190 किलोमीटर अंतरावर आहे.
विशेष उपकरणांसह सध्या हीट सोर्सला टॅप करण्यासाठी खोल ड्रिलिंग केले जात आहे. इंजिनियर्सना केवळ 35 मीटरच्या खोलीवर 100 अंश तापमान आढळल्याने प्रारंभिक परिणाम उत्साह वाढविणारे आहेत. 100 अंश तापमानावर पाणी उकळू लागते. ड्रिलिंग 500 मीटर खोलवर केले जाणार असून त्यानंतर परिणामांनुसार स्थळाच्या पूर्ण क्षमतेचा शोध लावणे आणि टॅप करण्यासाठी ड्रिलिंग 1 किलोमीटर खोलीपर्यंत पोहोचणार आहे.
प्रारंभिक टप्प्यात 1 मेगावॅट विजेसाठी प्रायोगिक प्रकल्पाची निर्मिती करण्यात येत आहे. याचे काम चालू वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. परिसरातील 10 गावांना याच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. हा छोटा प्रकल्प भारतातील पहिला भूतापीय ऊर्जानिर्मती प्रकल्प असणार आहे.
प्रकल्पाच्या विकासानंतर पुढील टप्प्यांमध्ये अधिक खोल आणि मोठय़ा विहिरी खोदण्यात येतील. यात ऊर्जा उत्पादनाची अत्यंत अधिक क्षमता असणार आहे. प्रारंभिक अनुमानानुसार पुगामध्ये 100 मेगावॅटहून अधिक जियोथर्मल ऊर्जेची क्षमता आहे. मागील वर्षी या ऐतिहासिक जियोथर्मल प्रकल्पासाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षऱया करण्यात आल्या होत्या.