निरोप समारंभात भावना केल्या व्यक्त; कोरोना, महापुरात कर्मचाऱ्यांचे काम उल्लेखनिय
कोल्हापूर प्रतिनिधी
कोरोना, महापुरात कर्मचाऱ्यांनी उल्लेखनिय काम केले. प्रत्येक प्रसंगात सर्वांचे सहकार्य मिळाले. सर्वांच्या सहकार्यामुळे, टिमवर्कमुळे प्रत्येक संकटाचा सामना करणे शक्य झाले, असे प्रतिपदान प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले. डॉ. बलकवडे यांची पुण्याला बदली झाल्याने त्यांचा सोमवारी महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ व उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, करवीर निवासनी श्री अंबाबाईची प्रतिमा व रोप देण्यात आले.
डॉ. बलकवडे म्हणाल्या, महापुरामध्ये महापालिकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी रात्रंदिवस केलेले काम प्रशंसनीय आहे. महापालिकेतील सभागृहाची मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून चांगले काम करण्याची जबाबदारी आली. प्रशासक पदाची जबाबदारी सांभाळताना कुठेही महापालिकेच्या यंत्रणेला काम करताना मान खाली घालायला लागू नये ही माझी जबाबदारी होती.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी प्रशासक डॉ. बलकवडे यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे सर्वांनी पार पाडली. त्यांच्याकडून गेल्या दोन ते अडीच वर्षात खुप काही शिकायला मिळाले. कोविडच्या काळात शहरात लसीकरण मोहिम त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबवले गेले. उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी प्रशासकांनी नेहमी चांगल्या कामाकरीता पाठींबा देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. याचबरोबर सहायक आयुक्त संजय सरनाईक, डॉ. विजय पाटील, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता नारायण भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत, सुत्रसंचालन व आभार शाखा अभियंता सुरेश पाटील यांनी केले.
13 वर्षापासून प्रलंबित काम पूर्ण : संजय भोसले
महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले यांनी प्रशासक डॉ. बलकवडे या कार्यत्तपर व सर्व सामान्यांना न्याय देणाऱ्या आहेत. त्यांनी कोणत्याही अधिकाऱ्यावर अथव्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होवू दिला नाही. सातव्या वेतन आयोग लागु करुन कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला. 13 वर्षापासून प्रलंबीत असलेली पदोन्न्तीची प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली.
डॉ. बलकवडे भावूक
अडीच वर्षापेक्षा जास्त काळ डॉ. कादंबरी बलकवडे महापालिकेच्या प्रशासक राहिल्या. या काळात त्यांचे नागरीकांसह कर्मचाऱ्यांबरोबर जिव्हाळाचा नाते निर्माण झाले. सत्कारानंतर मनपा चौकातून घरी जाताना डॉ. बलकवडे भावूक झाल्या होत्या.