प्रतिनिधी,रत्नागिरी
रत्नागिरीच्या समुद्रातून अवैध निर्यात करत असताना जप्त करण्यात आलेल्या साडे तीन हजार शेळ्या-मेंढ्यांपैकी सुमारे 1 हजार 800 शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू झाला आहे. आजारपणामुळे हा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, उर्वरित शेळ्या-मेंढ्याना अहमदनगर येथे ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सुमारे अशा पकारे मृत्यू ओढवल्यामुळे 1 कोटी हून अधिक रूपयांचे नुकसान झाले आहे.
कस्टम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 21 एपिल 2023 रोजी साडेतील हजार शेळ्या मेंढ्या घेवून जाणारी एक बोट कर्नाटक विजयदुर्ग येथून गुजरात येथे जाणार असल्याचे कस्टम विभागाला सांगण्यात आले होते.मात्र, अशा पकारे शेळ्याची वाहतूक गुजरात येथे होत असल्याचा पूर्वइतिहास नसल्याने कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना काही तरी काळेबेरे असल्याचा संशय आला त्यानुसार या बोटीवर कस्टम विभागाकडून नजर ठेवण्यात आली. दरम्यान, बोट 21 एपिल 2023 रोजी विजयदुर्ग येथून मार्गस्थ होताच तिने भारताचा समुद्र किनारा सोडून दुबईच्या दिशेने जात असल्याचे आढळून आले.
बोट दुबईच्या दिशेने वाटचाल करत असल्याची माहिती मिळताचा कोस्टगार्ड व कस्टम विभागाकडून रत्नागिरीच्या समुद्रात ऑपरेशन हाती घेण्यात आले. त्यानुसार ही बोट रत्नागिरीच्या आंग्रे पोर्ट येथे आणण्यात आली. तर बोटीवरील एका संशयिताला कस्टम विभागाकडून ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या या संशयिताकडे कसून तपास करण्यात येत आहे. अस्लम तायीब लोऱू,अली हुसेन,फिरोज सय्यद (रा. सर्व गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. अवैध वाहतूक करणारी बोट हस्तगत करण्यात आली असून, बोटीवरील शेळ्या-मेंढ्यांची बाजार भावानुसार 2.5 कोटी रूपये किंमत असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी तिघा संशयिताला अटक करण्यात आली आहे. तर यातील मुख्य आरोपी फरार असल्याचे कस्टम विभागाकडून सांगण्यात आले आहे. कस्टम विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रजमान ईद सणासाठी ही शेळ्या-मेंढ्यांची वाहतूक होत होती. अशा पकारे अवैधरित्या शेळ्या मेंढ्या घेवून एक बोट दुबईकडे जाणार असल्याची गुप्त माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या शेळ्या मेंढ्याचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. साडेतीन हजार शेळ्या-मेंढ्यांपैकी सुमारे 1 हजार 800 शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 1 हजार 700 शेळ्यांना अहमदनगर येथे ठेवण्यात आल्या आहेत. त्यांची पकृती ठिक असल्याचे सांगण्यात आले आहे.
शेळ्या-मेंढ्याचा लिलाव होणे गरजेचे होते
शेळ्या-मेंढ्या जप्त केल्यानंतर त्याचा तातडीने लिलाव झाला असता मेंढ्यांचा मृत्यू टाळता आला असता व होणारे नुकसान कमी झाले असते. मात्र कायदेशीर प्रकियेमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या हे प्रकरण उच्च न्यायलयाकडे असून तेथील निर्णयावरून पुढील पकिया हाती घेण्यात येईल अशी माहिती अमित नायक, उपायुक्त कस्टम विभाग,रत्नागिरी यांनी दिली.