वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील काही घटनांचा दाखला देत सोमवारी अंतर्गत सुरक्षेच्या विषयावर सभागृहात व्यापक चर्चा व्हावी अशी मागणी केली आहे. लोकसभेतील शून्य प्रहरावेळी त्यांनी ही भूमिका मांडली आहे. सद्यकाळात काश्मीरपासून पंजाबपर्यंत स्थिती बिघडत चालली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हत्यासत्र सुरू आहे. काश्मिरी पंडित, शीख आणि काही अन्य लोकांची हत्या झाली आहे. पंजाबच्या तरनतारनमध्ये काही दिवसांपूर्वी हल्ला झाला आहे. तेथील पोलीस स्थानकाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्याचे म्हणत चौधरी यांनी अंतर्गत सुरक्षेवर मोठी चर्चा व्हायला हवी असे नमूद पेले आहे.