वाळवंटी नदीच्या पात्रामध्ये विवेकानंद पर्यावरण जागृती मंचातर्फे साफसफाई मोहीम
राज्यातील जागरूक नागरिक, पर्यावरण प्रेमी मोठ्या प्रमाणात भाग घेणार
प्रतिनिधी / वाळपई
सत्तरीतील वाळवंटी नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊ लागले आहे. प्लास्टिक, दारूच्या बाटल्या, घरातील कचरा यामुळे वाळवंटी नदीचे पात्र प्रदूषित होऊ लागलेले आहे. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाबरोबरच म्हादई नदीच्या पात्रात जाण्याची भीती आहे. यामुळे नदीतील जैवविविधता धोक्यात येणार आहे. हे ओळखून विवेकानंद पर्यावरण जागृती मंच व केरी ग्रामपंचायत जैवविविधता समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या नदीच्या पात्रामध्ये ‘चला करू वाळवंटी प्लास्टिक फ्री’ मोहीम हाती घेतली आहे. हा उपक्रम स्तुत्य असून पर्यावरण संवर्धन व रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. रविवार दि. 4 जून रोजी ही मोहीम राब]िवण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये केरी पंचायत क्षेत्र, पर्ये पंचायत क्षेत्र व सत्तरीतील व राज्यातील वेगवेगळ्dया भागातून पर्यावरणप्रेमी भाग घेणार आहेत.
वाळवंटी नदी ही पश्चिम घाटाचा समृद्ध इतिहास सांगणाऱ्या जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. या नदीच्या पाण्यावर अंजुणे धरण प्रकल्प, पडोसे पाणी प्रकल्प व सांखळी पाणी प्रकल्प अवलंबून आहेत. मात्र गोवा बेळगाव महामार्गावर नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊ झाले आहे. यामुळे ही नदी प्रदूषित होत असल्यामुळे जैवविविधता धोक्यात येत असल्याचे दिसत आहे.
या नदीच्या पात्रात असलेला कचरा पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाबरोबर नदीच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास नदीमधील जैवविविधता धोक्यात येईल. याची दखल घेऊन विवेकानंद पर्यावरण जागृती मंचेने केरी पंचायत जैवविविधतेच्या सहकार्याने कचरा निर्मूलन मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेची सुरूवात रविवार दि. 4 जून रोजी सकाळी होणार आहे. वाळवंटी नदीच्या उभो गुणो येथून मोहिमेला सुरूवात होणार आहे. गोमंतकीयांनी सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात
गोवा बेळगाव दरम्यानच्या महामार्गावरून जे प्रवासी प्रवास करतात ते मोठ्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा टाकतात. प्लास्टिक पिशव्यातून आणलेले पदार्थ सरळ नदी पात्रात फेकतात. तसेच दारूच्या बाटल्यांचा खच नदीच्या पात्रामध्ये दिसून येत आहे. अनेक वेळा केरी व पर्ये पंचायतीने या संदर्भात जनजागृती केली. मात्र त्याचा फ्ढारसा परिणाम झालेला नाही. यामुळे सांखळी ते केरी भागापर्यंत वाळवंटी नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा साचला आहे.