ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर आज मुंबईतील पक्ष कार्यालयात भाजपने विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी विजयाचे शिल्पकार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांच्या हस्ते पक्ष कार्यालयात राज्यसभेवर (rajyasabha) निवडून गेलेल्या नवीन खासदारांचं सत्कार केला. यावेळी बोलताना फडणवीसांनी जिंकल्यानंतर अनेकांच्या तोंडाचं पाणी पळाले आहे, काही बावचळलेत आहेत काही पिसाटले आहेत, असा हल्लाबोल फडणवीसांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.
राज्यसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयानंतर अनेकांच्या तोंडाचं पाणी पळाले आहे. तर काही पिसाळले असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर (shivsena) हल्लाबोल केला आहे. या पराभवानंतर मुख्यमंत्र्यानी आता अंतर्मुख होऊन विचार करायला हवा असा सल्लाही फडणवीस यांनी दिला आहे. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसह राज्यातील इतर निवडणुकांमध्ये भाजपला मोठा विजय मिळवायचा आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी उत्साह कायम ठेवावा असे आवाहनही फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केला आहे.
राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर आज मुंबईतील पक्ष कार्यालयात भाजपने विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी फडणवीस यांनी, हा विजय आजारी असूनही मतदानासाठी आलेल्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित केला. त्यांच्या मतदानामुळे आमची तिसरी जागा निवडून आली. आपण जिंकल्यानंतर अनेकांच्या तोंडाचं पाणी पळाले आहे, काही बावचळले आहेत काही पिसाटले असल्याचा हल्लाबोल फडणवीसांनी केला. निवडणुकीत जे विजयी होतात त्यांनी आनंद साजरा करायचा असतो, त्यांनी उन्माद करायचा नसतो असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केले.
मुख्यमंत्र्यांनी अंतर्मुख व्हावं
शिवसेना उमेदवाराच्या पराभवानंतर मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने अंतर्मुख व्हायला हवं असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. पुढे बोलताना फडणवीस यांनी, राज्यातील विकास थांबला आहे. आमच्या काळातले सर्व प्रकल्प थांबवून राज्याचं अतोनात नुकसान होत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था सध्या वाईट आहे. आमच्या सरकारच्या काळात सरकारविरोधात आंदोलन करणारे सत्ताधी विमा कंपन्यांना मोठा फायदा करून देत असून शेतकऱ्यांना या सरकारने वाऱ्यावर सोडले असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.
किमान दोन चांगली कामं करून दाखवा
“सरकार चालवण्यासाठी चालवायचं आणि समाजातल्या एकाही घटकाचा विचार करायचा नाही ही अवस्था आपल्याला आज पाहायला मिळतेय. २०१९ साली मोदींवर विश्वास ठेवून राज्याच्या जनतेनं भाजपाला सर्वाधिक जागा देत शिवसेनेसोबत सत्ता दिली होती. पण या सत्तेचा अपमान झाला. ही सत्ता बाजूला सारून आमच्या पाठीत खंजीर खुपसून जी नवीन सत्ता तुम्ही स्थापन केली, किमान ती सत्ता तरी व्यवस्थित चालवून दाखवा. किमान सरकारची दोन चांगली कामं करून दाखवा. अडीच वर्षाच्या काळात जनतेचं काम केलं अशी एकही गोष्ट सरकार दाखवू शकत नाही”, असंही फडणवीस म्हणाले.
आता महापालिका, विधान परिषदेवर लक्ष
फडणवीस यांनी आगामी विधान परिषदेसाठी भाजप सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. विधान परिषदेची जागा आपण लढवत आहोत निवडणूक सोपी नसल्याचेही त्यांनी सांगितले. विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेपेक्षाही अधिक लोकांची सदसद्बुद्धि जागृत असेल असा दावा त्यांनी केला. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.