वृत्तसंस्था/ मेलबर्न
जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या ऑस्ट्रेलियाच्या तयारीवर अॅशेसविषयीच्या चर्चेचा परिणाम होण्याची शक्यता ऑफस्पिनर नॅथन लियॉनने फेटाळून लावली आहे. भारताविऊद्धचा आगामी सामना ही ‘ग्रँड फायनल’ आहे, असे त्याने म्हटले आहे. 7 जूनपासून हा अंतिम सामना खेळविला जाणार आहे, तर 16 जूनपासून इंग्लंडविऊद्धची पाच कसोटी सामन्यांची अॅशेस मालिका सुरू होणार आहे.
या मालिकेची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा चाली आहे. कारण ऑस्ट्रेलिया मागील 22 वर्षांत प्रथमच सदर मालिका इंग्लंडच्या भूमीवर जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘होय, आम्ही अॅशेस खेळणार आहोत. पण त्याआधी आम्हाला एक मोठी लढत खेळावी लागणार आहे, ज्यासाठी आम्ही तयार झालो आहोत. ही आमची भव्य अंतिम लढत आहे आणि त्यानंतर आमच्यासाठी हंगाम पुन्हा सुरू होईल, असे लियॉनने म्हटले आहे.
मला माहीत आहे की, प्रत्येक ऑस्ट्रेलियन चाहता अॅशेसची वाट पाहत आहे आणि तसेच ते असायला हवे. पण त्याचबरोबर या अंतिम सामन्याबद्दलही त्यांना उत्सुकता असायला हवी, असे त्याने पुढे म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया कोणत्याही सराव सामन्याशिवाय अॅशेस मालिकेमध्ये प्रवेश करेल आणि इंग्लंडविऊद्धच्या लढतींपूर्वी होणारा जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना हा त्यांचा एकमेव सामना असेल. या वर्षाच्या सुऊवातीला भारतामध्ये कसोटी मालिकेत 1-2 अशा फरकाने पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा आगामी लढतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मत लियॉनने व्यक्त केले आहे.