District level Tutari Kavi meeting was held in Sawantwadi
आपण जी कविता लिहितो त्यामध्ये रिदम आहे का आणि आपण लिहिलेली कविता जे लिहीत नाहीत आणि जे प्रेषक आहेत त्यांच्या मनाला शेवटपर्यंत भिडेल अशी अभ्यास पूर्ण परिपूर्ण कविता लिहायला हवी. कविता शेवटपर्यंत रसिक प्रेक्षकांनी ती ऐकायला हवी आणि तीच खरी कविता मनाला भिडते आणि त्यासाठी कवी साहित्यिक अथवा कोणीही असो आपल्यात काय बुद्धिमत्ता आहे हे ओळखून साहित्य अथवा कविता लिहायला हवी. असे मत जेष्ठ कवी साहित्यिक जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलनाचे अध्यक्ष अनंत वैद्य यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील मोती तलावाच्या काठी केशवसुत कट्ट्याजवळ जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलन व मराठी भाषा दिन कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे आयोजित करण्यात आला होता. जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलन केशवसुत कट्टा तुतारी जवळ मराठी भाषा दिनी सावंतवाडीचा मोती तलाव ची सायंकाळ साहित्य कवी मैफिलीने रंगली या कवी संमेलनाचे उद्घाटन दीप प्रजनन करून श्री वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी प्रमुख पाहुणे कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, स्वागताध्यक्ष कोमसापचे .सुभाष गोवेकर, कोमसाप केंद्रीय कार्यकारणी सदस्या साहित्यिका उषा परब, कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जी. ए. बुवा, जिल्हा सचिव कवी विठ्ठल कदम, मराठी अध्यापक संघाचे भरत गावडे, मालवणी कवी रुजारियो पिंटो, कुडाळ तालुका अध्यक्षा वृंदा कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कवी संमेलनाचे अध्यक्ष अनंत वैद्य यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
सावंतवाडी / प्रतिनिधी