वन्यप्राणी लोकवस्तीत शिरू लागल्याने धास्ती, वन खात्याने बंदोबस्त करण्याची मागणी
प्रतिनिधी /सांगे
सांगे तालुक्यातील नेत्रावळी भागात जंगली श्वापदांकडून पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला जाण्याचे प्रकार घडू लागले असून अशीच एक घटना रा†ववारी रात्री दाबाळ-नेत्रावळी येथील अऊण प्रभुदेसाई यांच्या गोठ्याच्या ठिकाणी घडली. तेथे बांधून ठेवलेल्या कुत्र्याचा जंगली जनावराने फडशा पाडला. त्यांच्या मते, रात्री 12 नंतर ही घटना घडली असून फडशा पाडणारे जनावर एक तर वाघ किंवा ा†बबटा असण्याची शक्यता त्यांनी व्यकत केली आहे.
गेल्या काही ा†दवसांपासून नेत्रावळीतील कसबवाडा, जांभुखडप, चावडी येथे जंगली जनावरांनी कुत्र्यांचे बळी घेण्याच्या घटना घडलेल्या आहेत. ा†बबट्यासारखी जनावरे लोकवस्तीत ा†शरून पाळीव जनावरांची ा†शकार करू लागल्याने लोकांत घबराट ा†नर्माण झाली आहे. नेत्रावळी ग्रामपंचायत क्षेत्र हे अभयारण्याला भिडून असून अनेक वाडे अगदी नेत्रावळी अभयारण्याच्या सीमेवर आहेत. जंगली जनावरे गावात ा†शरू लागलेली असून आज त्यांनी पाळीव प्राण्यांची शिकार केली आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांना देखील धोका ा†नर्माण झाला आहे, असे प्रभुदेसाई यांनी सां†गतले.
रात्री 9.30 वा. आपण कुत्र्याला जेवण घातले. सकाळी पाहतो तो कुत्रा मृत झाला होता आणि त्याचा जंगली जनावराने फडशा पाडला होता. कुत्र्याला लोखंडी साखळीने बांधून ठेवल्याने जंगली जनावराने त्याची शिकार केली, पण त्याला नेता आले नाही. जंगली जनावराच्या पाऊलखुणांवरून तो वाघ किंवा बिबटा असावा तसेच आकाराने मोठा असावा असे वाटते, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले.
वन्यजीव विभाग पथकाकडून पाहणी
या घटनेची कल्पना प्रभुदेसाई यांनी नेत्रावळी वन्यजीव ा†वभागाला ा†दल्यानंतर वना†धकारी दीपक महाले यांच्यासह त्यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. रात्री गस्त घालण्यात येणार असून वा†रष्ठांना अहवाल देण्यात येणार आहे. योग्य ती कृती करू, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. वन खात्याने सापळा रचून या जंगली जनावराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. मधोमध गाव आा†ण चोहोबाजूंनी नेत्रावळी अभयारण्य असलेल्या या भागात जंगली जनावरांकडून लोकांना, पाळीव प्राण्यांना खूप धोका आहे. गेल्याच आठवड्यात नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील वटे-दाबाळ, नेत्रावळी येथे जंगली जनावराची धडक दुचाकीला बसून खुटये, नेत्रावळी येथील दयानंद चंद्रकांत वेळीप या 41 वर्षीय इसमाचा मृत्यू होण्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर वन खात्याने जंगली जनावरे लोकवस्तीत येऊ नयेत म्हणून जंगल आा†ण गाव यांच्यादरम्यान लोखंडी जाळीचे कुंपण उभारावे, अशी मागणी होत आहे.