बेळगाव – विधानसभा अधिवेशनात खानापूरच्या आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनी खानापूर तालुक्यातील कालव्यातून गाळ काढण्यासाठी मशीनऐवजी नरेगा कामगारांची मदत घेण्याची मागणी केली. आज सभागृहाच्या कामकाजात खानापूरच्या आमदार डॉ.अंजली निंबाळकर म्हणाल्या की, तहसीलमधील कालव्यातील गाळ काढण्यासाठी मशिनचा वापर केला जात आहे. अवैज्ञानिकरीत्या उपसा केल्याने कालव्यातून पाणी भरून वाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे. यंत्रांच्या अतिवापरामुळे तहसीलमध्ये १ लाखाहून अधिक नरेगा कामगार बेरोजगार होत आहेत. एकही विभाग नरेगाचा वापर करत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावर मंत्री मधुस्वामी यांनी सांगितले की, नरेगा योजनेचा वापर करण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. त्यांनाही टार्गेट देण्यात आले आहे.
Trending
- शाहू महाराजांचा सन्मानच राखायचा होता तर त्यांना राज्यसभेवर का पाठवलं नाही ? संजय मंडलिकांचा महाविकास आघाडीला सवाल
- कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा तुरुंगात मृत्यू, उत्तरप्रदेश पोलीस अलर्ट मोडवर!
- बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा; ५० पेक्षा जास्त जनावरांची सुटका
- अवैध दारू विक्रेत्याला सीसीबी पोलिसांनी केली अटक
- कणकुंबी तपासणी नाक्यावर 7 लाख 98 हजार रोख रक्कम जप्त
- हरमलात पावणे दोन कोटीचे ‘मॅजिक मशरुम्स’ जप्त
- चारही जणांची दहा तास चौकशी
- गोव्यातून गेला तामिळनाडूतील शाळा बॉम्ब स्फोटाने उडवून देण्याचा ईमेल