कोल्हापूर प्रतिनिधी
मिसाईल मॅन डॉ. अब्दुल कलाम आज आपल्या सोबत नसले तरी त्यांच्या विचाराचा वारसा आपल्याला ऊर्जा प्रदान करतो. त्या ऊर्जेच्या जोरावरच आपण भारताची भावी पिढी घडविण्याचे कार्य करावयाचे आहे. त्यासाठी सर्वांनी सदैव तयार राहिले पाहिजे, असे उद्गार आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी काढले. ते मुंबई येथे आयोजित डॉ. एपीजे अब्दुल कलाम भारत पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नातेवाईक डॉ. एपीजे एमजे शेख सलीम हे होते एमआयएलएफ संस्थेच्या वतीने व डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशनच्या सहयोगाने मुंबईतील जुहू क्लब मिलेनियम येथे हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. यामध्ये या कार्यक्रमात कोल्हापुरा तील सामाजिक कार्यकर्ते जयेश ओसवाल यांना मेजर जनरल विक्रमदेव डोगरा व डॉ. एपीजे एमजे शेख सलीम यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी अमिताभ गुप्ता, लेफ्ट.कर्नल सलील जैन, मेजर जनरल विक्रमदेव डोगरा, सुप्रसिद्ध गायक उदित नारायण, सिने अभिनेत्री पुनम झंवर, अभिनेते नितीश भारद्वाज, अभिनेता अभिजीत लहरी, रणजीपटू विशाल महाडिक, पॉप सिंगर शिवानी कश्यप यांच्यासह अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. प्रास्तविक सोनिया मेयरस यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पौर्णिमा कुलकर्णी यांनी केले.