जुन्या पी. बी. रोडवरील ब्रिजजवळील दुकानांमध्ये शिरले पाणी : पिकांना पाऊस पोषक, शेतकऱयांना दिलासा
प्रतिनिधी /बेळगाव
सोमवारी मान्सूनने काहीसा जोर धरला. त्यानंतर मंगळवारी पहाटेपासूनच दमदार सरी कोसळल्या. तसेच सतत पावसाचा शिडकाला सुरूच होता. त्यामुळे गटारी तुडुंब भरून वाहू लागल्या. काही ठिकाणी गटारीत कचरा साचल्याने गटारींचे पाणी रस्त्यांवरून वाहत होते. जुन्या पी. बी. रोडवरील ओव्हरब्रिजजवळ डेनेजचा पाईप फुटून गटारीचे पाणी अनेक दुकानांमध्ये शिरले. यामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली. पहिल्याच संततधार पावसाने स्मार्ट सिटीच्या कामांचा दर्जा उघडा पडला आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मंगळवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचून होते. तर काही ठिकाणी गटारी तुडुंब भरून पाणी वाहत होते. मान्सून सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच पावसाने जोर धरला. त्यामुळे शेतकऱयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पावसाची संततधार सुरू असल्यामुळे याचा सामना करत विद्यार्थ्यांसह साऱयांना शाळा, महाविद्यालये, कार्यालये गाठावी लागली. या पावसामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली. पावसामुळे बाजारपेठेतील फेरीवाले, बैठे व्यापाऱयांना कसरत करावी लागत होती. बाजारहाटसाठी आलेल्या नागरिकांना पावसात भिजतच खरेदी करावी लागत होती. छत्री, रेनकोट यांचा आधार घेत पुढे जावे लागत होते. यातच काही ठिकाणी गटारींचे पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने त्यामधून वाट काढताना कसरत करावी लागत होती.
पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील सखल भागांमध्ये पाणी साचून होते. त्यामधून वाहने जाताना ते पाणी इतर वाहनांवर शिंथडत होते. स्मार्ट सिटीची कामे नियोजनबद्धरित्या झाली नसल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसून येत होते. गोवावेस येथील स्विमिंगपूलसमोर सिग्नलजवळच पाणी साचून होते. गोगटे सर्कलजवळही पाणी साचले होते. अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवरच पाणी साचल्याने स्मार्ट सिटी म्हणायचे की आणि काय म्हणायचे? असा प्रश्न उपस्थित होत होता.
स्मार्ट सिटीची कामे अनेक ठिकाणी अर्धवट आहेत. त्या ठिकाणी तर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. सात वर्षांपासून ही कामे सुरू आहेत. मात्र अजूनही अर्धवटच आहेत. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातही संततधार पाऊस
पावसाचा जोर वाढल्याने ग्रामीण भागातील नाले प्रवाहित झाले आहेत. मात्र पूर्ण क्षमतेने नाले प्रवाहित होण्यासाठी अजूनही दमदार पावसाची गरज आहे. मंगळवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे पाणथळ जमिनीमध्ये पाणी होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे पिकांना हा पाऊस पोषक ठरला आहे. भातलावणी करणाऱया शेतकऱयांनाही पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
खानापूर परिसरात नदीच्या पातळीत वाढ
24 तासांत कणकुंबी, लोंढा भागात 4 इंच पावसाची नोंद
खानापूर ः खानापूर तालुक्मयामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर केला असून सोमवारी रात्रीपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ होताना दिसत आहे. वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाल्याने आणखी पाऊस वाढण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. खानापूर तालुक्मयात मंगळवारी सकाळी 8 वाजता झालेल्या पर्जन्यमापक नोंदीनुसार कणकुंबी येथे 112 मि. मी. जवळपास 4 इंच पावसाची नोंद झाली आहे. तर लोंढा येथे 120 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे जांबोटी येथे 76 मि. मी, गुंजी 71 मि. मी., असोगा 38 मि. मी. तर कक्केरी 89 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. नंदगड भागामध्ये 106 मिलिमीटर पाऊस झाला असून खानापूर व परिसरात केवळ 34 मि. मी. पावसाची नोंद झाली. मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.