ऑनलाईन टीम/ तरुण भारत
आंबा म्हटल की तोंडाला पाणी सुटतं. बाजारात गेला की सगळीकडे आंब्याचाच सुगंध तुम्हाला जाणवेल. आंबा हा फक्त खाण्यासाठीच नाही तर याला धार्मिक खूप महत्व आहे. कोणत्याही शुभप्रसंगी, मंगल कार्यात आणि सणाच्या दिवशी दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. कलशपूजन हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य प्रतीक आहे. कलशात नेहमी आंब्याची पाने ठेवतात. अश्या या आंब्याच्या सीझमध्ये मनसोक्त आंबा खायला मिळण म्हणजे जग जिंकल्याचा फिलच जणू. मात्र बदलत्या लाईफस्टाईलने अनेकांचे वाढलेले वजन आणि ते कमी करण्यासाठी सुरु असलेला आट्टापिटा यामुळे अशा फळांपासून दूर रहावे लागते. आंबा खाल्याने वजन वाढते असा अनेकांचा समज असतो. तर अनेकांचे म्हणणं असत की आंब्यात साखरेचे प्रमाण जादा असल्याने शरीरात साखरेचे प्रमाण वाढते. यात नेमक तथ्थ काय आहे हे आज जाणून घेणार आहोत. यासाठी तज्ञांचा सल्लाही घेणार आहोत. आंबा खाल्याने वजन आणि साखर वाढते का याचे उत्तर जाणून घेऊया चला तर मग.
आंबा कधी खावा
तज्ञाच्या मतानुसार आंबा खाण्याचा योग्य काळ गुढी पाडवा ते अक्षयतृतीया हाच आहे. परंतू अलिकडे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या ऋतुंच नेमकेपण बदललेले आहे. त्यामुळे आंबा खाण्यचा काळही मागेपुढे झाला आहे. अजूनही वळीवाचा एकजरी पाऊस पडला तरी त्यानंतर काहीजण आंबा खात नाहीत. कारण या पावसाचे परिणाम या आंब्यावर होतात, व ते शरीराला अपायकारक असतात असे त्यांचे मत आहे. त्यामुळे आंबा बाजारात आल्यावर महाग असला तरी तो खरेदी करणारा एक वर्ग आहे. मात्र, आंबा बाजारात उपलब्ध आहे तो पर्यंत खाण्यास हरकत नाही, असे आहार तज्ञ मानतात.
आयुर्वेद आणि आंबा
आयुर्वेदानुसार लांबट आंब्यापेक्षा गोल आंबे जास्त चांगले मानतात. बिनारेषेचे, चांगले पिकलेले अधिक गर असलेले पातळ सालीचे आणि लहान कोय असलेले आंबे चांगले समजावेत. आंब्याचा मोहोर थंड, रुची उत्पन्न करणारा असून अतिसार, रक्तदोष आणि कफ पित्त दूर करणारा आहे. कैरी मध्ये आम्लता आणि क्षाराचे प्रमाण खूप आहे. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो. पन्हे प्यायालामुळे उन्हाळ्याचा त्रास खूपच कमी होतो. कैरीचा कीस फडक्यात घालून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांची दमणूक आणि ताण कमी होतो. आपल्याला आरोग्य देण्याच्या दृष्टीने या दिवसात कैरीची डाळ खाण्याची पद्धत आहे. कच्च्या कैरीचा गर अंगाला लावून अंघोळ केल्यास घामोळ्याचा त्रास होत नाही. कैरीच्या बाठीचे चूर्ण हिरडय़ांच्या तक्रारी कमी करण्यास उपयुक्त आहे. तसेच हे चूर्ण पाण्यात घालून आंघोळ केल्यास घामोळ्याचा त्रास होत नाही. आंब्याची कोवळी पाने चावून नंतर टाकून द्यावीत. त्या रसाने आवाज सुधारतो, खोकला कमी होतो आणि हिरडय़ांचा पायोरीयाही कमी होतो. आंब्याच्या पानांचा चीक टाचांच्या भेगा कमी करण्यास उपयुक्त आहे. आंब्याचा गोंदाचा सांधेदुखीत खूपच उपोयोग असल्याचे आयुर्वेदात म्हटले आहे. आयुर्वेदात, साल, पाने, फुले आणि फळांचा वापर पोट आणि त्वचेच्या अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.
आंबा खाल्याने वजन आणि साखर वाढत नाही
आंबा खाल्याने वजन आणि शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते हा भ्रम आहे. एका आंब्यात फक्त 40 ते 60 कॅलरीज असल्याने वजन वाढायचा प्रश्नच येत नाही. कोणतेही बाब अती खाल्ली की वजन वाढतेच. आंब्याने नैसर्गिक ग्लुकोज असले तरी आंबा खाल्याने शरिरातील साखरेच्या प्रमाणात वाढ होत नाही. फक्त योग्य वेळेत आणि प्रमाणात तो खा. शुगर असणाऱ्यांनी रोज एखादा आंबा खाण्यास हरकत नाही. आंब्यामध्ये कोलोजेज प्रोटेन नावाच्या घटकामुळे त्वचा ओघळत नाही, तसेच तजेलदार राहते. आंब्यामध्ये मोठय़ा प्रमाणात कार्बोहायड्रेट असते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात शरिराला उर्जा मिळते. सिझनमध्ये आंबा खाल्याने ती उर्जा शरीरात साठवली जाते. या कारणानेच आंबा खाल्यानंतर आपणास वजन वाढल्यासारखे वाटते. त्याचे सकारात्मक परिणाम वर्षभर दिसून येतात. मॅग्निफेरा टॉक्सिन असल्याने पोटात जळजळ होते. अर्धवट कच्चा तसेच कच्चा आंबा हा कॅन्सरवर प्रभावी ठरतो. रताळानंतर सर्वाधिक अँटी ऑक्सिडंट आंब्यामध्ये आढळते. कोलॉजनचे प्रमाण अधिक असल्याने मांसाहार न खाणाऱया लोकांसाठी उपयुक्त ठरते. आंबा सकाळी अकरा ते चार यावेळेत खा. अपचनावर उपायकारक आहे. फ्रोजन केलेला आंबा किंवा पल्प खाणे टाळा.
रिया मिलींद गाडवे ( आहारतज्ञ)
आंबा हे भारत आणि पाकिस्तान या देशांचे राष्ट्रीय फळ आहे. बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे. जगाच्या आंबा उत्पादनापैकी 56 टक्के आंब्याचे उत्पादन एकटय़ा भारतात होते. भारतात आंब्याच्या जवळपास दोन हजार जातींची नोंद आहे. परंतु 25 ते 30 जाती या व्यापारीदृष्टय़ा महत्त्वाच्या मानल्या जातात. पश्चिम महाराष्ट्रात देवगड, रत्नागिरी, कर्नाटक, केसर या आंब्याला पसंदी दिली जाते.