छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी आज मतदान संपन्न होत आहे. जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर चुरशीने मतदान सुरु आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत 96 टक्के मतदान झाल्याची माहीती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. डॉ. डी. वाय पाटील यांनी आज दुपारनंतर मतदान केले. कसबा बावडा येथिल केंद्र क्र.45 वर त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. संजय डी. पाटील होते.
राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या आज मतदानादिवशी दुपारपर्यंत 13538 सभासदापैकी 12201 सभासद मतदारांनी आपल्या मतदाना हक्क बजावला. यामध्ये एकूण 96 टक्के मतदान पार पडले आहे.
दरम्यान, कसबा बावडा मतदान केंद्र क्रमांक 44, 45 ,46 व 47 मधील 975 पैकी 919 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कसबा बावड्यातून एकूण 94% मतदान झाले असून गत निवडणुकीच्या तुलनेत सध्याच्या निवडणुकीमध्ये एक टक्क्यांनी मतदानाचा आकडा वाढला आहे.
राधानगरी मतदान केंद्रावर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 285 पैकी 263 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला सरासरी आतापर्यंत 92. 20 टक्के मतदान झाले. राधानगरीमध्ये एकूण 285 पैकी 263 मतदान झाले असून एकूण 92 टक्के मतदान झाले. कसबा तारळे गावात 96 टक्के मतदान होऊन 231 पैकी 222 मतदारांनी मतदान केले. तसेच धामोड गावामध्ये 683 पैकी 643 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. धामोडमध्ये एकूण 94 टक्के झाले.
कागल तालुक्यातील वंदूर मतदान केंद्रावर 96 पैकी 94 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वंदूर करनूर आणि लिंगनूर या गावातील मतदारांसाठी वंदूर येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या इमारतीमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. वंदूर केंद्राकडील एकूण 105 मतदारांपैकी 9 मयत सभासद झाले आहेत. 96 पैकी 94 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सत्ताधारी आघाडीच्या नेत्या शौमिका महाडिक यांनी मतदान केंद्राला दुपारी भेट दिली.
तसेच, हुपरी येथील % मतदान केंद्रावर एकूण 96 टक्के मतदान झाले असून 215 पैकी 190 सभासदांनी मतदान केले.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक खोची तालुका हातकणंगले मतदान केंद्रावरती 148 पैकी 146 मतदारांनी मतदान केले. तसेच कुभोज गावात 365 पैकी 337 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण 92.32 टक्के मतदान झाले. तसेच पुलाची शिरोलीत ९० % तर नागावमध्ये ८५% मतदान झाले.