बेळगाव : रेल्वेची गती वाढावी, तसेच प्रदूषण टाळले जावे, यादृष्टीने रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण केले जात आहे. मागील दोन वर्षांपासून सुरू असणारे हे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. बेळगाव रेल्वेस्थानक परिसरात विद्युतीकरणाचे काम सुरू असून लवकरच विजेवर धावणारी रेल्वे बेळगावमध्ये दाखल होणार आहे. भारतीय रेल्वेने देशातील महत्त्वाच्या मार्गांचे विद्युतीकरणाचे काम हाती घेतले आहे. पुणे-हुबळी या मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण करण्यात येत आहे. लोंढा ते धारवाड यादरम्यानचे काम पूर्ण झाले असून खानापूर ते बेळगाव रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण अंतिम टप्प्यात आहे. नैर्त्रुत्य रेल्वेचे कर्मचारी रेल्वेस्थानक परिसरात ओव्हरहेड केबल जोडत आहेत. विद्युतीकरणाचे काम लवकर पूर्ण झाल्यास इलेक्ट्रिक इंजिनवर धावणाऱ्या एक्स्प्रेस बेळगावमध्ये दाखल होतील. विद्युत इंजिनमुळे रेल्वेची गती वाढणार असल्याने प्रवासाचा कालावधी कमी होईल. त्यामुळे कमी कालावधीत अधिक प्रवास करणे शक्य होईल. डिझेल इंजिनमुळे होणाऱ्या वाढत्या प्रदूषणाला विद्युत इंजिनमुळे ब्रेक लागेल. त्याचबरोबर बेळगाव-बेंगळूर मार्गावर ‘वंदे भारत’ रेल्वेसेवा सुरू होण्यासही मदत होणार आहे.
Previous Articleविकृतींशी लढणार बेळगावचा ‘गदाधारी’!
Next Article राकसकोप जलाशयात केवळ दोन फूट पाणीसाठा शिल्लक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment