आजपासून 4 एप्रिलपर्यंत विकासकाम चालणार
बेळगाव : राजहंसगड (ता. बेळगाव) येथे पुढील 15 दिवसांसाठी पर्यटक व नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सोमवारी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. राजहंसगडावर पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे. रस्त्यावर ग्रॅनाईट बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ते पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे नागरिक व पर्यटकांना 15 दिवसांसाठी प्रवेशबंदी जाहीर करण्यात आली आहे. सध्या राजहंसगडावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गर्दीच्यावेळी कामे करणे कठीण जात आहे. त्यामुळे दि. 21 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी असणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.