तरूण भारत
इथेनॉल निर्मिती ही गुऱ्हाळघरांसाठी नवसंजिवनी ठरू शकते त्यामुळे गुऱ्हाळघरांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे.
राज्यातील साखर कराखान्यांची गाळप क्षमता वाढवली आहे. त्यांना मिळालेल्या या परवानगीमुळे गुराऴघरांवर परिणाम होऊन त्यांचं अर्थकारण बिघडण्याची शक्यता आहे. त्यातच साखर कारखानदार एकत्रित येवून गुऱ्हाळघरांना एफआरपीच्या कायद्यात अडकवू पाहत आहेत. यामुळे गाळप परवाना आणि साखर आयुक्तालयाच्या परवानग्या यामध्ये पिचला जाऊन त्यांच्यावर अर्थिक अरिष्ट येऊ शकते. वाढत्या ऊत्पादन खर्चामुळे बरिच गुऱ्हाळघरे बंद पडली आहेत. त्यामुळे अशा अर्थिक चक्रात सापडलेल्या गुऱ्हाळघरांना इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी. अशी मागणी राजू शेट्टी आपल्या निवेदनात केली आहे.
गुऱ्हाळघरांनी एकत्र येऊन इथेनॉल प्रकल्प उभा केल्यास किंवा गुऱ्हाळघरांमध्ये इथेनॉल निर्मिती केल्यास उसउत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन तसे धोरण तयार करण्याचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केंद्रिय रस्ते आणि वाहतूक मंत्री गडकरी यांच्याकडे केले.
साखर कारखान्यांच्याही पुर्वी गुऱ्हाळघरांनी शेतकऱ्याना अर्थिक स्थिरता दिली आहे. पण आता डबघाईला आलेल्या उद्योगाला नवसंजिवनी देण्यासाठी इथेनॉल सारख्या प्रकल्पाची गरड असल्याचे निवेदनात म्हटले आहे.