मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : सांखळीत कृषी कार्यालय, वीज उपकेंद्राचे उद्घाटन : पालिका क्षेत्रात सरकारचे भरीव प्रकल्प
प्रतिनिधी /सांखळी
आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण करणारे प्रकल्प राबविण्यासाठी सर्वच घटकांनी पाठपुरावा करावा. मानव संसाधन विकासावर भर देताना शेवटच्या घटकापर्यंत विकासाची द्वारे खुली करत आम्हाला प्रगती साधायची आहे. विकासाच्या प्रक्रियेत सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. जनतेच्या हितासाठी सरकार अनेक योजनांना चालना देत असून सतत नव्या कल्पना घेऊन स्वयंपूर्णता साध्य करण्यासाठी कार्यरत आहे. पालिका, पंचायतींनी यासाठी विशेष योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी साखळीत केले.
सांखळी पालिका इमारतीत विभागीय कृषी कार्यालयाच्या तसेच वीज उपकेंद्र कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी कृषीमंत्री रवी नाईक. नगराध्यक्ष राजेश सावळ, उपनगराध्यक्ष ज्योती ब्लेगन वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस, कृषी संचालक नेव्हिल अल्फोन्स, नगरसेवक आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, शुभदा सावईकर, यशवंत माडकर, ब्रह्मानंद देसाई, रश्मी देसाई, गोपाळ सुर्लकर आदी उपस्थित होते.
कृषी विकासाला गती देण्यासाठी सरकार विविध योजना आखत आहेत वीज खात्यातही अनेक सुधारणा होत असून भूमिगत वीजवाहिन्या व इतर बाबतीतही सरकारकडून नवनवीन योजनांना चालना दिली जात आहे. सांखळी मध्यवर्ती ठिकाणी कृषी व वीज कार्यालय सुरू केल्याने लोकांची सोय होणार आहे.
सांखळीत अनेक नवे प्रकल्प आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, मात्र पालिकेने त्यासाठी विशेष योगदान देणे अपेक्षित आहे. उत्पन देणारे प्रकल्प उभारून स्वयंपूर्ण होण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी केले.
कृषीमंत्री रवी नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून हरितक्रांती व धवलक्रांती बरोबरच वृक्षलागवडीवर भर देताना प्रत्येकाने योगदान द्यावे. असे आवाहन केले.
मान्यवरांच्या उपस्थितीत कृषी व वीज कार्यलल्याचे उदघाटन करण्यात आलें या वेळी नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी आपले विचार व्यक्त केलें सूत्रसंचालन दत्तप्रसाद जोग यांनी केलें तर वल्लभ सामंत यांनी आभार मानले