आतापर्यंत 150 शेतकऱयांनी दिले अर्ज : सहा दिवसांचा अवधी शिल्लक
प्रतिनिधी /बेळगाव
रिंगरोड करण्याचा जो घाट घालण्यात आला आहे; त्याला सर्वांनी एकजुटीने विरोध करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱयांनी अर्ज दाखल करणे महत्त्वाचे आहे. यासाठी तालुका म. ए. समितीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आतापर्यंत 150 शेतकऱयांनी अर्ज दाखल केले आहेत. अजूनही मोठय़ा प्रमाणात शेतकऱयांनी अर्ज देणे बाकी असून त्यांनी तातडीने अर्ज द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
रिंगरोडमध्ये शेतकऱयांच्या सुपीक जमिनी जात आहेत. त्यामुळे सर्वच शेतकरी रिंगरोडला विरोध करणार आहेत. मात्र वेळकाढूपणा न करता तातडीने त्याची तयारी करणे महत्त्वाचे आहे. तालुक्मयातील अनेक गावांतील शेतकऱयांच्या जमिनी या रिंगरोडमध्ये जात आहेत. त्याबाबतचे सर्व्हे क्रमांकही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तेव्हा शेतकऱयांनी तातडीने आपली सर्व कागदपत्रे तयार करून हरकती दाखल करणे महत्त्वाचे आहे.
कॉलेज रोडवरील तालुका म. ए. समितीच्या कार्यालयामध्ये अर्ज दाखल करून घेण्यात येत आहेत. मात्र शेतकऱयांनी अजूनही गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून येत आहे. आता केवळ सहा दिवसच शिल्लक आहेत. तेव्हा तातडीने शेतकऱयांनी अर्ज आणून द्यावेत, असे कळविण्यात आले आहे. आतापर्यंत 150 शेतकऱयांनी अर्ज दिले आहेत. तेव्हा इतर शेतकऱयांनीही अर्ज द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. कॉलेज रोडवरील कार्यालयात ऍड. शाम पाटील व इतर कार्यकर्ते हे अर्ज जमा करून घेत आहेत.