उत्रे प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यात वळिवाने हुलकावणी दिली.मान्सुन पूर्वही पाऊस नाही. जून महिन्याचा आठवडा संपला तरी अजून पावसाची प्रतीक्षा करावी लागली आहे.पाऊस नाही नदीत पाणी नाही त्यामुळे माळरानावरील पिके वाळू लागली आहेत शेतात भात पेरणी केली आहे तर काही ठिकाणी अद्याप नांगरणी पण नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या मध्यापर्यंत दोन तीन वळीवाचा पाऊस पडतो. किंवा मे महिन्याच्या अखेरीस मान्सून पुर्व पाउस पडतो पण चालू वर्षी वळीवाने हुलकावणी दिली मान्सून पुर्व पाऊस नाही जून महिन्याचा पंधरवडा आला तरीही पाऊसाचा पत्ता नाही . त्यामुळे पेरण्या करण्याच्या खोळंबल्या आहेत.हवामानाचा अंदाज देखील पाऊस लांबणीवर पडणार आहे असा आहे. शेतकऱ्यांला पावसाची अजून किती दिवस वाट पाहावी लागणार आहे.
नदीत पाणी नाही. विहिरींनी तळ गाठला आहे त्यामुळे पिकं वाळू लागली आहेत
शासनाच्या पाटबंधारे नियमानुसार सात जून ते दहा जून पर्यंत नदी वरील बधांर्यातील दारे सोडावी लागतात त्यामुळे नदीतील पाणी संपले आहे.नद्या कोरड्या पडल्या आहेत. पाऊस लवकर नाही पडला तर पिण्याच्या पाण्या बरोबर शेती साठीच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. आता पावसाची गरज आहे.सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागून राहिल्या आहेत. सध्या आकाशात कुठे तरी ढग दिसतात तेही पांढरे व कोरडे आहेत.दिवसभर उन्हाळी वातावरण आहे. त्यामुळे सर्वजन पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.