रेल्वेमंत्र्यांनी हात जोडून सोडली पहिली रेल्वे
वृत्तसंस्था/ बालासोर, नवी दिल्ली
ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी उशिरा झालेल्या अपघातानंतर केंद्र सरकार या घटनेवर सतत लक्ष ठेवून आहे. घटनास्थळापासून ते इस्पितळापर्यंत सर्वत्र व्यापक जाळे सुसज्ज ठेवून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य राबविल्यामुळे तिसऱ्या दिवशीच रेल्वेसेवा पूर्ववत झाली आहे. बालासोरमधील अपघातस्थळी रेल्वेमार्ग दुऊस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर एका मुख्य लाईनवरून रविवारी रात्री उशिरा रेल्वेसेवा कार्यान्वित करण्यात आली. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वत: घटनास्थळी उपस्थित होते. पहिली रेल्वे ऊळावरून जात असताना वैष्णव यांनी हात जोडून सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थनाही केली.
सुरुवातीला मुख्य लाईनवरील रेल्वेसेवा पूर्ववत करण्यासाठी बुधवारपर्यंत वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अश्विनी वैष्णव आणि धर्मेंद्र प्रधान या दोन केंद्रीय मंत्र्यांनी गेले दोन दिवस घटनास्थळी ठाण मांडून रेल्वेसेवा तातडीने पूर्ववत करण्यात मोलाची भूमिका पार पाडली. रेल्वेमंत्री वैष्णव अपघातानंतर अवघ्या 12 तासांनी बालासोरमध्ये घटनास्थळी पोहोचले होते. तेव्हापासून ते आपली सर्व पूर्वनियोजित कामे व दौरे रद्द करून ओडिशामध्येच होते. येथे त्यांनी रेल्वे ट्रॅकच्या दुऊस्तीपासून ते रुग्णालयापर्यंतच्या जखमींची भेट घेण्यापर्यंत बऱ्याच आघाड्यांवर काम पाहिले. तसेच अपघात नेमका कसा झाला याचा तपास करण्यातही ते सातत्याने अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेताना दिसून आले. त्यांनी घटनेच्या सखोल चौकशीचे आदेशही दिले आहेत.
आमची जबाबदारी संपलेली नाही!
रविवारी रात्री उशिरा ट्रॅक सुरू झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना वैष्णव यांनी आमची जबाबदारी अजून संपलेली नाही. बेपत्ता लोकांना त्यांच्या कुटुंबियांपर्यंत शक्मय तितक्मया लवकर शोधण्यात मदत करणे हे आमचे ध्येय आहे. तसेच अजूनही ओळख न पटलेल्या मृतांचे नातेवाईक शोधण्यासाठीही लक्ष द्यावे लागणार असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान मोदींच्या आदेशानंतरच ट्रॅकच्या दुऊस्तीचे काम सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. नादुरुस्त रेल्वेट्रॅकचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला होता. दुऊस्ती पथकाने परिश्र्रमपूर्वक आणि हुशारीने काम केले आणि घटनेनंतर 51 तासांच्या आत अप आणि डाऊन दोन्ही मार्ग पूर्ववत केले, असे ते पुढे म्हणाले.
रात्री 10.40 वाजता पहिली रेल्वे रवाना
भीषण अपघातानंतर 51 तासांनंतर रविवारी रात्री 10.40 वाजता ओडिशातील बालासोर येथील अपघातग्रस्त भागातून पहिली रेल्वे निघाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सदर मालगाडी विशाखापट्टणम बंदरातून रुरकेला स्टील प्लान्टकडे सोडण्यात आली होती.
यंत्रणा बिघाडासंबंधी चार महिन्यांपूर्वी इशारा
ओडिशा रेल्वे दुर्घटनेनंतर आता अनेक बाबी उघड होत आहेत. हा अपघात की घातपात असा संशय व्यक्त होत असतानाच फेब्रुवारीमध्येच रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने इंटरलॉकिंग सिस्टममध्ये बिघाड झाल्याचा इशारा दिला होता, असे स्पष्ट झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी रेल्वे कार्यालयाला पत्र लिहून हा इशारा दिला होता. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममधील बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापकाने फेब्रुवारीमध्ये सिग्नल बिघाडाचा मुद्दा उपस्थित केला होता. सदर पत्रात त्यांनी म्हैसूर विभागातील बिरूर-चिकजाजूर विभागातील होसादुर्गा रोड स्थानकावर 8 फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनेचाही दाखला दिला होता. त्यानुसार त्यांनी लिहिलेल्या पत्रात यंत्रणेतील गंभीर बिघाडाबद्दल माहिती दिली होती. आता या पत्राच्या अनुषंगाने सीबीआय किंवा अन्य यंत्रणांकडून तपास झाल्यास या घटनेकडे कोणी दुर्लक्ष केले? याचा उलगडा होणार आहे.
अपघातानंतर 48 तासांनंतर तरूण बेशुद्धावस्थेत सापडला
अपघाताच्या 48 तासांनंतर रविवारी रात्री घटनास्थळावरून एक प्रवासी जिवंत सापडला. अपघाताच्या वेळी तो डब्यातून बाहेर पडला आणि झुडपात कोसळल्यानंतर बेशुद्ध पडला होता. दिलाल असे या तरूणाचे नाव असून तो आसामचा रहिवासी आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत