प्रतिनिधी /पणजी
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील लोकांना, विशेषतः मुस्लिम बांधवांना ईद-उल-फित्रच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
ईद-उल-फित्र हा पैगंबर मोहम्मद यांनी सांगितलेल्या चिरंतन आणि अमूल्य आदर्शांनुसार जगण्यासाठी स्वतः पुनर्समर्पित होण्याचा एक योग्य प्रसंग आहे. केवळ अशा प्रकारे मानवजातीला शांतता, सौहार्द आणि एकतेचा मार्ग सापडू शकतो. धार्मिक मत्सर, कट्टरता, जातीय द्वेष, पंथीय संघर्ष आणि लोकांमधील अविश्वास यांनी ग्रासलेल्या आजच्या जगात, आपण आपल्या आध्यात्मिक गुरूनी दाखविलेल्या मार्गाचे आणि आदर्शांचे प्रामाणिकपणे अनुसरण करणे आवश्यक आहे. यामुळे आपले जीवन आनंदी आणि निरोगी होईल. म्हणून आपण आपल्या दैनंदिन जीवनात प्रेषित मोहम्मदांनी आपल्या कल्याणासाठी आणि आनंदासाठी दिलेल्या चिरंतन संदेशांचा अक्षरशः सराव करू या. या वषीचा ईद-उल-फित्रचा उत्सव सर्वांना नवीन आनंद, प्रेम आणि शांती घेऊन येवो, असे राज्यपालांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांकडूनही शुभेच्छा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ईद म्हणजे मानवतेच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देण्याची आणि गरजू लोकांचे जीवनमान सुधारण्याची संधी आहे, असे म्हटले आहे.
आपल्या संदेशात मुख्यमंत्र्यांनी समाज, राज्य आणि देशाच्या हितासाठी काम करण्याचे लोकांना आवाहन केले आहे. या दिवशी आपण मानवतेच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देऊया, असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.