सावंतवाडी / प्रतिनिधी
चराठा गावातील गावठण येथील घाणवड वाडीतील बंधाऱ्याच्या दुरावस्थेबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले गेले. हा बंधारा गेली कित्येक वर्ष नादुरूस्त अवस्थेत होता. याची डागडुजी न करण्यात आल्याने तेथील शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या बंधाऱ्याच्या आधारावर शेतकरी उन्हाळी पीक घेत असत. पण बंधाऱ्याच्या दुरावस्थेमुळे पाणी साठवण होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले. ही माहीती ग्रामपंचायत सदस्य अमर चराठकर यांनी उपसरपंच अमित परब यांच्या लक्षात आणून दिली. लगेेचच दौऱ्यावर आलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना भेटून ही गोष्ट लक्षात आणून दिली. त्यावर त्यांनी येणाऱ्या काळात या बंधाऱ्याला नीधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले .